मुंबई – महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील अलिबागपर्यंत मान्सून पुढे सरकला असून पुढील 48 तासांत तो मुंबईत धडकण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने शनिवारी सांगितले. मुंबईस सर्वसाधारणपणे 11 जुनला मान्सुन येतो. पण तो अजून पर्यंत तेथे पोहचला नव्हता. आज शहराच्या काहीं भागात हलका पाऊस झाला.
नैऋत्य मान्सून मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, महाराष्ट्राचा आणखी काही भाग, कर्नाटकचा उर्वरित भाग, तेलंगणा आणि छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेशचा काही भाग, उत्तर प्रदेशचा आणखी काही भाग, आणि उत्तराखंडच्या काही भागात पुढे सरकला आहे.
हिमाचल प्रदेश, हरियाणाचा काही भाग आणि जम्मू, काश्मीर आणि लडाख येथेही मान्सुन दाखल झाला आहे. मान्सुनची उत्तर सीमा आता अलिबाग, सोलापूर, उदगीर, नागपूर , मंडला, सोनभद्र, बक्सर, सिद्धार्थनगर, पंतनगर, बिजनौर, यमुनानगर,
उना आणि द्रासमधून जाते. मान्सुन पुढे सरकण्यासाठी सध्या अनुकुल वातावरण आहे. पुढील दोन दिवसांत तो दिल्ली, गुजरात, पुर्व राजस्थान आणि पंजाबच्याही काही भागात पोहचेल.