Manoj Jarange : आरक्षण कसे देणार सोप्या शब्दात सांगा; मंत्र्यांच्या शिष्टमंडळासमोर मनोज जरांगेंचा संताप
Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर २९ ऑगस्टपासून पुन्हा उपोषणाला बसण्याच्या निर्णयावर आंदोलक मनोज जरांगे पाटील ठाम आहेत.

Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलक मनोज जरांगे हे 29 ऑगस्टपासून उपोषण करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्याच्या तीन मंत्र्यांनी त्यांची भेट घेतली आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत, शंभुराज देसाई, आमदार प्रसाद लाड यांच्या शिष्टमंडळाने आंतरवली सराटीमध्ये जाऊन जरांगेंची भेट घेतली आणि त्यांना आंदोलन न करण्याचे आवाहन केले. (Manoj Jarange)
मराठा आरक्षणावर राज्य सरकारची भूमिका नेमकी काय याची माहिती सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे यांना दिली. त्याचवेळी ज्या गोष्टींवर जरांगे यांना आक्षेप आहे, त्यावर काम करण्याचे आश्वासनही दिले. (Manoj Jarange)
हैदराबाद गॅझेटनुसार मराठ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता, मात्र मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि संजय शिरसाट यांनी सगळ्याचा पचका केला. ज्या 58 लाख नोंदी सापडल्या आहेत, त्यांना प्रमाणपत्र कसे देणार आहात ते आधी स्पष्ट करा, अशा शब्दात जरांगे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. (Manoj Jarange)
तुम्ही लई चिंगूस माणूस आहात, सगळे दमादमाने घेताय. मराठा आरक्षण पटकण देऊन टाका, असे जरांगे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना उद्देशून म्हटले. शिंदे समितीने राज्यातील 58 लाख कुणबी नोंदी शोधल्या. (Manoj Jarange)
त्यानुसार राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू केले आणि कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आदेश काढले. मात्र यामध्ये बावनकुळे आणि संजय शिरसाट यांनी खोडा घातला आणि प्रमाणपत्र रद्द करण्याचा आदेश दिला, असा आरोप जरांगेंनी केला.
तसेच, आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चेला येताना सोबत संबंधित अधिकारी घेऊन येत चला. जी प्रमाणपत्रे रद्द केली आहेत, किंवा ज्यांना प्रमाणपत्रे दिली जात नाहीत, त्यावर काय करता येईल हे अधिकाऱ्यांना समोर बसवून विचारा. मराठ्यांना प्रमाणपत्रे कशी देता येतील हे सोप्या शब्दात सांगा, अशी मागणी जरांगे यांनी केली. (Manoj Jarange)
जर, आम्हाला तुम्ही प्रमाणपत्र देणार नसाल तर स्पष्ट सांगा, आम्ही उद्यापासून आरक्षण मागणार नाही. आम्ही दुसऱ्या राज्यात जाऊन हमाली करतो, सगळे मराठे फासावर जातो, असा म्हणत जरांगे यांनी संताप व्यक्त केला. राज्यात ओबीसी प्रमाणपत्राचे काम कधी थांबले आहे का? मग मराठ्यांना प्रमाणपत्र देण्याचे काम का थांबवले? असा सवाल त्यांनी केला. (Manoj Jarange)
राज्य सरकारला २८ ऑगस्टची मुदत
जरांगे यांनी २९ ऑगस्टपासून उपोषण करण्याच्या निर्णयाचा पुनरुच्चार केला. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याची आपली मागणी पुन्हा एकदा मांडली. आपल्या निर्णयावर ठाम राहत, त्यांनी आपल्या मागण्यांवर कार्यवाही करण्यासाठी सरकारला २८ ऑगस्टची अंतिम मुदत दिली आहे. (Manoj Jarange)
मराठा समाजातील पात्र सदस्यांना कुणबी प्रमाणपत्रे आणि वैधता कागदपत्रे देण्याची प्रलंबित प्रक्रिया २८ ऑगस्टपर्यंत पूर्ण करावी. तसेच, मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी झालेल्यांविरुद्ध दाखल केलेले सर्व गुन्हे मागे घेण्याची मागणीही त्यांनी केली. (Manoj Jarange)
Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती





