Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना जबर धक्का; तब्बल 5 बड्या नेत्यांचे तडकाफडकी राजीनामे, राजकारणात खळबळ
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील अंतर्गत नाराजी आता चव्हाट्यावर आली आहे.

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील अंतर्गत नाराजी आता चव्हाट्यावर आली आहे. पक्षात सामाजिक कार्यकर्त्यांपेक्षा ठेकेदारांचे प्राबल्य वाढल्याचा गंभीर आरोप करत महिला आघाडीच्या पाच पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. या सामूहिक राजीनाम्यामुळे अहिल्यानगरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. (Maharashtra Politics)
उत्तर विभाग महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख विमल पुंडे यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. त्यांच्यासोबत शहर संघटिका कमल नरोडे, उपशहरप्रमुख उर्मिला लोळगे, विभागप्रमुख रुपाली महाडिक आणि प्रिती शिंदे यांनीही पदाचा राजीनामा दिला आहे. (Maharashtra Politics)
‘1 टक्का कार्यकर्ते, 99 टक्के ठेकेदार’
विमल पुंडे यांनी राजीनामा पत्रात पक्षाच्या सध्याच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘पक्षात 1 टक्का सामाजिक कार्यकर्ते, तर 99 टक्के ठेकेदार आहेत,’ असा थेट आरोप त्यांनी केला आहे. (Maharashtra Politics)
स्वार्थासाठी अनेकजण पक्षात दाखल झाले असून, अशा वातावरणात काम करणं त्रासदायक ठरत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पक्षाची खरी ताकद निष्ठावान शिवसैनिक असूनही काही पदाधिकाऱ्यांच्या वर्तनामुळे पक्षाची प्रतिमा सर्वसामान्यांमध्ये खराब होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. (Maharashtra Politics)
शिर्डीतील घटनेवरून नाराजी
शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांच्या शिर्डी दौऱ्यात काही पदाधिकाऱ्यांनी केलेला गोंधळ हा पक्षहितासाठी नव्हे, तर व्यक्तिगत स्वार्थासाठी होता, असा आरोप पुंडे यांनी केला आहे. (Maharashtra Politics)
या घटनेमुळे महिला पदाधिकाऱ्यांना पक्षात काम करणं अवघड झाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. भविष्यात अशा घटना पुन्हा घडण्याची शक्यता असल्याने आपण आणि इतर महिला पदाधिकारी पक्षाच्या बैठका आणि कार्यक्रमांवर बहिष्कार टाकत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. (Maharashtra Politics)
‘शिवसेनेला जय महाराष्ट्र’
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर अपेक्षित पद्धतीने पक्षाचं काम होत नसल्याची नाराजीही पुंडे यांनी व्यक्त केली. संघटना मजबूत करण्यासाठी आर्थिक बळ दिलं जात असलं, तरी त्यातून पक्षविस्ताराऐवजी गटबाजी आणि पदाधिकाऱ्यांमधील संघर्ष वाढत असल्याचा दावा त्यांनी केला. (Maharashtra Politics)
त्यामुळे स्वाभिमान जपण्यासाठी पक्षापासून दूर जाण्याचा निर्णय घेत असल्याचं सांगत त्यांनी ‘शिवसेनेला जय महाराष्ट्र’ अशी भूमिका घेतली आहे. (Maharashtra Politics)

34 वर्षांची शिवसेनेतील वाटचाल
विमल पुंडे यांनी 1992 पासून तब्बल 34 वर्षे शिवसेनेत काम केल्याचं सांगितलं आहे. महिला आघाडीच्या पदाधिकारी ते नगरसेविका असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. सर्वसामान्य परिस्थितीतून राजकारण करताना साखर सम्राटांना आव्हान देत निवडणूक लढवल्याचाही त्यांनी उल्लेख केला आहे. (Maharashtra Politics)
पाच महिला पदाधिकाऱ्यांनी एकाचवेळी राजीनामे दिल्याने अहिल्यानगरमधील शिंदेसेनेतील अंतर्गत नाराजी उघड झाली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आता या राजीनाम्यांवर पक्ष नेतृत्व काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Maharashtra Politics)
Eknath Shinde Politics : शिंदेनी भाकरी फिरवली ! ‘या’ बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश





