मुंबई – शक्य तितक्या लवकर राज्यातील साऱ्या जनतेचे लसीकरण करून हे राज्य करोनामुक्त करण्याच्या इराद्याने महाराष्ट्राने केंद्राकडे जादा लसींची मागणी नोंदवली आहे.
केंद्र सरकारने जुलै महिन्यात महाराष्ट्रासाठी 1 कोटी 15 लाख लसींचे डोस देण्यात येणार असल्याचे कळवले आहे. पण महाराष्ट्राने अधिकाधिक लोकांना शक्य तितक्या लवकर लस देण्यासाठीची आपली सिद्धता ठेवल्याने केंद्राने जुलै महिन्यासाठीच जादाचे 1 कोटी 25 लाख डोस महाराष्ट्राला द्यावेत, अशी मागणी महाराष्ट्राने केंद्राकडे केली आहे.
लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्र देशात अव्वल आहे. राज्यात रोज तेरा लाख लोकांना डोस देण्याची व्यवस्था करण्यात आली असली तरी त्या प्रमाणात राज्याला लसींचा पुरवठा होत नाही.
जुलै महिन्यासाठी केंद्राने महाराष्ट्राला लसींचा जो कोटा निश्चित केला आहे, त्यानुसार रोज केवळ 3 लाख 70 हजार लोकांचेच लसीकरण होऊ शकते. महाराष्ट्रात आत्तापर्यंत 3 कोटी 30 लाख लोकांहून अधिक जणांचे लसीकरण झाले आहे.