ते म्हणतात ना गुन्हेगाराने कितीही हुशारीने गुन्हा लपविण्याचा प्रयत्न केला तरी तो काही ना काही चूक करतोच आणि पोलिसांच्या नजरेतून वाचू शकत नाही. असेच काहीसे गुजरातच्या वॉन्टेड गुन्हेगारासोबत झाले आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, 23 वर्षांनंतर सुरत पोलिसांनी एका खुनाच्या गुन्ह्यातील फरार गुन्हेगाराला उत्तर प्रदेशातील मथुरा येथून अटक केली. पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून गुजरातच्या वॉन्टेड गुन्हेगार साधूच्या वेशात राहत होता. त्याला मथुरेतील एका आश्रमातून पकडण्यासाठी सुरत पोलिसांना स्वतः भिक्षू आणि पुजारी असा वेश धारण करावा लागला. आणिअशात काही दिवसात गुन्हेगाराला 23 वर्षांनंतर मथुरेतून अटक करण्यात आली.
गुजरातच्या वॉन्टेड गुन्हेगाराचे नाव पदम उर्फ राकेश पांडा आहे. खरं तर, सध्या सुरत पोलीस वॉन्टेड गुन्हेगारांची यादी तयार करत आहेत आणि त्यांना पकडण्यासाठी मोहीम राबवत आहेत. विशेषत: पोलिसांच्या यादीत अनेक दिवसांपासून वॉन्टेड असलेल्यांचा शोध सुरू आहे. असे वॉन्टेड गुन्हेगार ज्यांच्यावर पोलिसांनी बक्षिसेही जाहीर केली आहेत. पोलिसांनी पकडलेल्या पदम उर्फ राकेश पांडा याच्यावर 45 हजारांचे बक्षीसही ठेवले होते.
काय होतं संपूर्ण प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, पदम उर्फ राकेश पांडा याने 2001 साली सुरत येथील विजय सचिदास नावाच्या व्यक्तीची हत्या केली होती. तेही फक्त कारण तो त्याच्या कथित मैत्रिणीच्या घरी जायचा. पदम उर्फ राकेश पांडा पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून मथुरेला पोहोचला होता आणि तिथे त्याने साधूचा वेश धारण केला होता. त्यानंतर मथुरेतील नंद गावात असलेल्या कुंजकुटी आश्रमात संन्यासी म्हणून तो राहू लागला . त्याला कोणी ओळखू नये म्हणून त्याने केस आणि दाढीही वाढवली.
मानवी पाळत आणि इतर संसाधनांच्या आधारे, मूळ ओडिशातील गंजम जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या या गुन्हेगाराला पकडण्यासाठी सूरत पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या प्रतिबंधक पथकाने मथुरा येथील कुंजकुटी आश्रमात पोहोचले. त्याला अटक करण्यासाठी पोलिसांनी स्वत: भिक्षू आणि पुरोहितांचा वेश धारण केला. त्यानंतर दोन दिवसांच्या अथक परिश्रमानंतर आरोपीला अटक करण्यात आली.
सुरतचे पोलीस आयुक्त अजय कुमार तोमर यांनी सांगितले की, सूरत शहर हे औद्योगिक शहर आहे. देशातील इतर राज्यातील लोक येथे रोजगारासाठी येतात. ज्यामध्ये काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकही सामील आहेत. पदम उर्फ राकेश पांडा हा मूळचा ओरिसातील गंजाम जिल्ह्यातील रहिवासी असून तो गुजरात येथील सुरतमध्ये भजिया बनवायचा.
2001 मध्ये आरोपी पदम उर्फ राकेश पांडा हा सुरत शहरातील उधना परिसरातील शांतीनगर सोसायटीत भाड्याने राहत होता. त्याचे शेजारी राहणाऱ्या एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते. विजय शांतीदास नावाचा व्यक्तीही अनेकदा त्या महिलेच्या घरी जात असे. आरोपी पदम उर्फ राकेश पांडा याला हे सर्व आवडले नाही. त्यामुळेच त्याने इतर मित्रांसोबत 3 सप्टेंबर 2001 रोजी विजयचे अपहरण केले. त्यानंतर उधना खाडीकिनारी नेऊन गळा आवळून खून केला. यानंतर मृतदेह नाल्यात फेकून सर्व आरोपी फरार झाले.