मुंबई – ‘खतरों के खिलाडी 12’ या रिअॅलिटी शोचे शूटिंग सुरू आहे. या शोमध्ये कंटेस्टन्ट जीवाची बाजी लावून खेळताहेत.शोमध्ये तारेवरची कसरत करताना अनेक जण शोमधून बाहेर देखील पडले आहेत.त्यामुळे आता शेवटचे ५ स्पर्धक या स्पर्धेत उरले आहेत. रोहित शेट्टीने होस्ट केलेल्या या शोने सर्वोच्च टीआरपीच्या यादीत स्थान मिळवले आहे आणि पुन्हा एकदा हा शो लोकांची मने जिंकण्यासाठी येत आहे. या शोचे शूटिंग सध्या केपटाऊनमध्ये सुरू आहे.
रुबिनाची हवा
‘खतरों के खिलाडी’ या रिअॅलिटी शोने पहिल्या आठवड्यातच खळबळ उडवून दिली आहे. लोकांना हा शो खूप आवडला आहे. हा शो नुकताच टीव्हीवर सुरू झाला असला तरी आता या शोला पाच फायनलिस्ट मिळाले आहेत. अलीकडेच रुबिना दिलैक आणि कनिका मान यांच्यात टॉप 5 साठी स्टंट झाला होता. रुबिना हा स्टंट जिंकण्यात यश मिळवले. अशाप्रकारे कनिका मान ‘खतरों के खिलाडी’ सीझन 12 मधून बाहेर पडली आहे ‘बिग बॉस’नंतर रुबीना आता ‘खतरों के खिलाडी’ही जिंकेल, अशी चाहत्यांना आशा आहे.
टॉप ५ मधील बाजीगर
‘खतरों के खिलाडी 12’ च्या फॅन पेज khatronkekhiladi.12.tazakhabar नुसार, रुबिना व्यतिरिक्त, तुषार कालिया, मिस्टर फैझू, जन्नत जुबैर आणि मोहित मलिक हे टॉप 5 स्पर्धकांच्या यादीत आहेत. यापैकी एकच स्पर्धक ‘खतरों के खिलाडी 12’ ची ट्रॉफी जिंकणार आहे. ‘खतरों के खिलाडी 12’चे शूटिंग दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये सुरू आहे. मात्र, रुबिनाने नुकतीच एक पोस्ट लिहून शोचा रॅपअप पूर्ण झाल्याचे सांगितले. तिने संपूर्ण टीमसोबत अनेक फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना हा सीजन नेमकं कोण जिंकणार याची उत्सुकता लागली आहे.