सातारा -कायम दुष्काळी म्हणून या भागाचा उल्लेख होत आला आहे. मात्र, गेल्या बारा वर्षांपासून हा कलंक पुसण्यासाठी अहोरात्र झटत आहे. जिथे प्यायला पाणी मिळत नव्हते त्या भागात आज हजारो एकर ऊस उभा आहे. आपल्या कामाची हीच पोचपावती आहे. यापुढे खटाव तालुक्याला दुष्काळी म्हणायची कोणाची हिंमत होणार नाही, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांनी सांगितले.
औंध परिसरातील येळीव, कळंबी, त्रिमली, लांडेवाडी या गावांतील विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभात ते बोलत होते. आ. गोरे म्हणाले, “”पुसेसावळीसह आठ गावांची योजना कार्यान्वित करण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत. गावोगावचा विकास साधण्यासाठी कटीबद्ध असून या भागात विकासकामांचा डोंगर यापूर्वीच उभा केला आहे. इतर विकास होतच राहिल पण सर्वांच्या जीवन मरणाचा शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविल्याचे समाधान सर्वात मोठे आहे.”
आ. जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची टाकी, अंतर्गत रस्ते, पाइपलाइन, स्मशानभूमी अशी कोट्यवधी रुपयांची कामे या भागात झाली आहेत, असे सांगून कराड उत्तरचे नेते धैर्यशील कदम यांनी जनतेने सुचविलेली सर्व कामे आम्ही पूर्ण करू, अशी ग्वाही दिली. पुसेसावळी गट विकासाचे रोलमॉडेल बनविण्याचा विश्वास वर्धनचे कार्यकारी संचालक विक्रमशील कदम यांनी व्यक्त केला.
यावेळी माजी सभापती शिवाजीराव सर्वगोड, भाजपचे तालुकाध्यक्ष धनंजय चव्हाण, सरपंच रेश्मा जाधव, उपसरपंच केशव जाधव, पोपट जाधव, पाणीपुरवठा अभियंता झेंडे, अमोल घाडगे, ज्ञानेश्वर पवार, दादासाहेब घार्गे, रुक्मिणी जगताप, शुभांगी जगताप, सुषमा घार्गे, किशोर सर्वगोड, चंद्रशेखर गुरव, दीपक घार्गे, विठ्ठलराव घार्गे, अमोल घार्गे, विकास घार्गे, संजय जाधव, विलास मोरे, मधुकर काळे, सरपंच दीपाली ढोले, उपसरपंच सतीश काळे, चेअरमन हरिदास सावंत, व्हाइस चेअरमन बनसिद्धेश्वर घाडगे, सदस्य अमीर मुलाणी, वसंत यादव, दौलत पवार, दीपक घाडगे, सागर करे, दिलीप जाधव, संतोष सूर्यवंशी, लांडेवाडीचे सरपंच अलका सूर्यवंशी, उपसरपंच शिवाजी सूर्यवंशी, दादासो फडतरे, अशोक सूर्यवंशी,
सुनील सूर्यवंशी, संगीता सूर्यवंशी, रविराज सूर्यवंशी, त्रिमलीच्या सरपंच सरपंच जयश्री येवले, उपसरपंच संजय येवले, चेअरमन अक्षय येवले, पांडुरंग घार्गे, सचिन येवले, शंकर येवले, महादेव पवार, रमेश पवार, तानाजी येवले, पंढरीनाथ येवले, रामचंद्र येवले, दादासो भोसले, शितल माने, उदय यादव, हरिदास येवले, संभाजी यादव, नितीन येवले, अंकुश येवले, अंकुश सूर्यवंशी आदीसह विविध गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.