मुंबई – मराठा आरक्षणावरून ( Maratha reservation ) गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) आणि मनोज जरांगे ( Manoj jarange ) यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु असल्याचे पाहायला मिळते. जरांगे यांनी सरकारला दिलेली मुदत पुढील काही दिवसात संपणार आहे. त्याअनुषंगाने सरकार देखील जरांगे यांची मनधरणी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. काल मंत्री गिरीश महाजन यांनी जरांगे यांची भेट घेतली त्यावेळी ‘सगेसोयरे’ यावरून झालेली बातचीत देखील समोर आली. त्यानंतर आता मंत्री असलेल्या भुजबळांनी थेट सरकारलाच शालजोडा लगावला आहे.
मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षणाची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरली आहे. दुसरीकडे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन, सरसकट ओबीसी आरक्षण देण्यास छगन भुजबळ यांचा तीव्र विरोध आहे.अशात सरकारची इकडे आड तिकडे विहीर अशी स्थिती झालेली असताना जरांगे सरकारची नव्हे तर सरकारचं जारांगेंची कोंडी करतंय.. असा उपरोधिक टोला माध्यमांशी बोलताना लगावला आहे.
मंत्री छगन भुजबळ यांना माध्यमकर्मींनी जरांगे सरकारची अडवणूक करतायेत का? असा सवाल विचारला त्यावर, जरांगे सरकारची कोंडी करत नसून.. सरकारचं जरांगे यांची अडवणूक करतय असा उपरोधिक टोला भुजबळांनी लगावला.
सगेसोयरे यामुळे कालची बैठक निष्फळ
“नोंदी असलेल्या सबंधीत नातेवाईकांना आणि सर्व रक्तातील सगेसोयरे यांना हे प्रमाणपत्र मिळावे. रक्ताचे सगेसोयरे हा शब्द आपण गृहीत धरला होता. आमच्या मामाला किंवा मावशी यांना देखील प्रमाणपत्र मिळावे,” या मागणीवर जरांगे ठाम आहेत. मात्र, असे करता येणार नाही आणि तसा निर्णय देखील घेता येणार नसल्याचे गिरीश महाजन म्हणाले आहे. त्यामुळे काल मंत्री आणि जरांगे यांच्यात झालेली बैठक निष्फळ ठरली आहे.