अका, (घाना) – संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेला भारताचा पाठिंबा असल्याचे संरक्षण राज्य मंत्री अजय भट्टयांनी म्हटले आहे. भट्ट हे घानामधील अक्रा येथे संयुक्त राष्ट्रांच्या शांती सुरक्षा मंत्रिस्तरीय बैठकीत भाग घेतला.
बुधवारी केलेल्या निवेदनामध्ये मुख्यत्वे सध्याच्या वातावरणात शांतीरक्षकांसमोरील आव्हाने आणि शांतता कायम राखण्यात महिलांची भूमिका याविषयांचा उहापोह करण्यात आला.
संयुक्त राष्ट्रांच्या शांतता राखण्याच्या प्रयत्नात भारत हा सैन्य योगदान देणारा आघाडीवरचा देश आहे. गेल्या सात दशकांमध्ये, भारताने वेगवेगळ्या 53 मोहिमांमध्ये 2, लाख 75 हजाराहून अधिक सैनिक पाठवले आहे, असेही भट्ट यांनी सांगितले.
या बैठकीत संयुक्त राष्ट्रांच्या नेतृत्वाखाली शांतता कायम राखण्याच्या मोहीमांच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी सर्व प्रमुख देणगीदार देश तसेच सैन्य योगदान देणारे देश एकत्र येतात.