थिम्पू :- भारताने उपांत्य फेरीत मालदीवचा 8-0 असा पराभव करून सॅफ अंडर-16 फुटबॉल करंडकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. एकतर्फी झालेल्या या सामन्यात एब्रोलंग आणि मोहम्मद अरबश यांनी प्रत्येकी दोन गोल केले. यासह विशाल यादव, मोहम्मद कैफ, लुईस जंगमिनलून आणि मानभाकुपर या ज्युनिअर खेळाडूंनी इतर गोल केले.
भारताचे सामन्याच्या सुरुवातीपासूनच वर्चस्व राहिले. विशाल यादवने 21व्या मिनिटाला गोल करताना संघाचे खाते उघडल्यानंतर भारताने आक्रमक खेळ सुरू ठेवताना एकामागोमाग एक गोल केले.
विशालनंतर 36व्या मिनिटाला कैफने गोल केला. मध्यंतरापर्यंत भारतीय संघ 2-0 ने आघाडीवर होता. लुईसने 53 व्या मिनिटाला तिसरा गोल केला. एबरलॉंगने 62व्या मिनिटाला आणि मानभाकुपरने 70व्या मिनिटाला 5-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर अर्बशने (77व्या आणि 84व्या मिनिटाला) दोन गोल केले.
एबरलॉंगने (82वे मिनिट) आणखी एक गोल केला. या विजयानंतर भारताच्या ज्युनिअर संघाचा अंतिम फेरीत पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील उपांत्य फेरीतील विजेत्याशी होईल.