नवी दिल्ली – सप्टेंबर अखेरच्या तिमाहीत भारतावरील परकीय कर्जाचे रक्कम वाढून 205 लाख कोटी रुपये इतकी झाली आहे. सध्या भारत सरकारचे कर्जरोखे बाजारात उपलब्ध आहेत. यावरील व्याजदर गृहीत धरल्यानंतर ही रक्कम 205 लाख कोटी रुपये इतकी होते. मार्च अखेर संपलेल्या तिमाहीत भारतावरील कर्जाचे मूल्य 200 लाख कोटी रुपये इतके होते. यामध्ये काही प्रमाणात वाढ झाली आहे.
राज्य सरकार वरील कर्ज 50 लाख कोटी रुपये इतके मोजले गेले आहे. व्याजदराच्या चढउतारानुसार कर्जाच्या रकमेत चढउतार होत असतात. एकूण परिस्थिती पाहिली असता भारतावरील कर्जाची रक्कम समाधानकारक आहे असे मत सरकारी अधिकार्यांनी व्यक्त केले.