न्यूयॉर्क – बहुतेक देशांमध्ये वापरण्यासाठी आणि पिण्यासाठी पाणी घरपोच मिळते अनेक महत्त्वाच्या जलस्त्रोतांमधून हे पाणी घरापर्यंत पोहोचवले जाते पण हे पाणी घरापर्यंत येण्यापूर्वी त्यावर प्रक्रिया केल्या जातात नुकत्याच झालेल्या एका संशोधनाप्रमाणे अशा जलनिसारण प्रक्रियेचा उलटा परिणाम दिसू लागला असून अँटिबायोटिक पाणी घरापर्यंत पोहोचत आहे त्यामुळे सामान्य नागरिक जी औषधे घेत आहेत त्याचा फारसा परिणाम आता दिसत नाही जगभरातील आघाडीचे आरोग्य विषयक नियतकालिक असलेल्या लँसेंटने आपल्या लँसेट प्लॅनेटरी या रिपोर्टमध्ये याबाबतचा खुलासा केला आहे या जलनिस्सारण प्रकल्पांमध्ये अँटीमाइक्रोबियल रेजिस्टन्स निर्माण होत असल्याने घरपोच मिळणाऱ्या पाण्यामध्ये अँटिबायोटिक्सचे प्रमाण जास्त जाणवत आहे भारत आणि चीनमध्ये याचे प्रमाण सर्वात जास्त आढळले आहे.
त्याला जबाबदार वेगळ्या प्रकारचे प्रदूषणच मानण्यात येत आहे परिसरात कार्यरत असलेल्या औषध निर्माण कंपन्या किंवा मोठ्या प्रमाणावर असलेल्या पोल्ट्री फार्म मुळे हे जलस्त्रोत प्रदूषित होत आहेत त्यामुळे जर या पाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर सुद्धा जर पाण्यामध्ये अँटिबायोटिक शिल्लक राहिली तर ती त्या स्वरूपात घरपोच नळाच्या पाण्याच्या स्वरूपात नागरिकांना उपलब्ध होत आहेत त्या पाण्याचा वापर केल्यामुळे प्रतिजैविकांशी लढण्याची क्षमताच कमी होते आणि औषधांचा कोणत्याही परिणाम होण्याची शक्यताही कमी होते शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर निर्माण होणाऱ्या वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट योग्य प्रमाणे लावली जात नसल्याने जमिनीत असलेले जलस्त्रोतही प्रदूषित होत आहेत.
या दोन्ही देशांमध्ये सर्वसामान्य नागरीक वापरली न गेलेली औषधे मोठ्या प्रमाणात फेकून देतात ही औषधे जलस्त्रोतांमध्ये मिसळली गेली, तरीसुद्धा अँटी मायक्रोबियाल रेजिस्टन्स तयार होतो अशा प्रकारचे पाणी वापरल्यामुळे नागरिकांमध्ये अँटिबायोटिक रेजिस्टन्स तयार होतो आणि अँटिबायोटिक औषधांचा कोणताही परिणाम या लोकांवर होत नाही कोरोना कालावधीमध्ये अनेकांच्या शरीरामध्ये असा अँटिबायोटिक रेजिस्टन्स आढळला भारत चीन आणि इतर देशांनी जर आपल्या जलस्त्रोतांचे प्रदूषण कमी करायचे असेल तर औषध कंपन्यांमधून निर्माण होणारा कचरा किंवा रुग्णालयातून तयार होणारा वैद्यकीय कचरा आणि पोल्ट्री फार्म मधून तयार होणारा कचरा यावर योग्य प्रकारे नियंत्रण ठेवायला हवे असा सल्ला लान्सेटने या लेखात दिला आहे.