मुंबई : ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीने आगामी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत कोणता भारतीय फलंदाज कमाल करणार? याची भविष्यवाणी केली आहे. ब्रेट लीच्या मते सध्या खेळाडूंचा फॉर्म पाहता युवा फलंदाज केएल राहुल टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत कमाल करु शकतो, असे म्हटले आहे.
ब्रेट लीने पुढे म्हटले आहे की, राहुलला फलंदाजीच्या क्रमवारीत योग्य स्थानी पाठवून विराट-रोहितवरील भार कमी करुन भारतीय संघाने फायदा करु घेतला पाहिजे. राहुल टी-20 क्रिकेटमध्ये दमदार प्रदर्शन करत आहे. त्याने आयपीएल 2021 मध्येही सर्वाधिक म्हणजे 626 धावा केल्या आहेत. 2018 च्या मोसमात राहुलने 659 रन केले, यानंतर 2019 साली 593 रन, 2020 साली 670 धावा केल्या. त्यामुळे भारताने विश्वचषकात राहुलला महत्त्वाचा फलंदाज म्हणून खेळवलं पाहिजे. ज्यामुळे त्याचं प्रदर्शन अजून सुधारेल आणि संघाला फायदा होईल.’ अस ब्रेट लीने म्हटलं आहे.
भारतीय संघ विश्वचषकाचा प्रबळ दावेदार
इंग्लंडचा संघ हा अनुभवाच्या दृष्टीने एक ताकदवर संघ असला तरी माझ्यामते भारत हा टी-20 विश्वकरंडक स्पर्धेचा प्रबळ दावेदार आहे. आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) मुळे भारताला अनेक युवा खेळाडू मिळाले आहेत. यामध्ये काही वेगवान गोलंदाज आहेतच. पण भारताची सलामी फलंदाजीही ताकदवर झाली आहे. ज्यामुळे भारत टी-20 विश्वकरंडक स्पर्धेचा प्रबळ दावेदार आहे, असं ब्रेट लीने म्हटले आहे.