मुंबई – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी पुण्यात शिवसेनेने हिंमत असेल तर पुन्हा निवडणूक घ्यावी, असे आव्हान दिले होते. यावर खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
ते म्हणाले, आमच्या सरकारविषयी, शिवसेनेबद्दल, हिंदुत्वाबद्दल प्रश्न उपस्थित करून राज्यातील जनतेला भ्रमित करण्याचा प्रयत्न भाजप नेत्यांकडून दोन वर्षांपासून सुरू आहे. महाराष्ट्रातील सत्ता गेल्यामुळे भाजपच्या राज्यातील नेत्यांसह केंद्रीय नेतेदेखील अयशस्वी आहेत. हिंमत असेल तर भाजपने आपल्या 105 आमदारांचे राजीनामे घ्यावेत आणि निवडणूक लढवून दाखवावी असं प्रतिआव्हान राऊत यांचे शहांना केले आहे.