मुंबई – आर्यन खान प्रकरणात वादात सापडलेले अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा खोचक टीका केली आहे.
दरम्यान, नवाब मलिक यांनी आज सोशल मीडियावर लाईव्ह व्हिडियो शेअर करत पुन्हा एकदा आरोप केला आहे.
ते म्हणाले,“एनसीबीने समीर वानखेडे आल्यानंतर एक गुन्हा दाखल केला. त्यात सारा अली खान, श्रद्ध कपूर , दीपिका पदुकोनला बोलावण्यात आलं. संपूर्ण बॉलिवूडला या प्रकरणात बोलावण्यात आलं, आजपर्यंत ना ते प्रकरण संपलं, ना आरोपपत्र. असं काय आहे की १४ महिने हे प्रकरण बंदच होत नाहीये.” असं म्हणत मलिक यांनी समीर वानखेडे यांचावर आरोप केलं केले आहे.
नवाब मलिक लाईव्ह