बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस 29 !
मुंबई : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये गृपमधील सदस्यांची नाती बदलताना दिसतं आहेत. एकेमेकांवर तितकासा विश्वास राहिलेला दिसून येत नाहीये वा कुठतरी थोडासा दुरावा आला आहे असे जाणवत आहे. जय, उत्कर्ष, मीरा आणि गायत्री यांचा गृप अगदी पहिल्यापासून चर्चेत आहे…
कोणतीही गोष्ट असो ते एकेमकांची साथ द्यायला पुढे मागे बघत नाहीत. कुठलही कार्य असो वा चर्चा असो हे चौघही एकत्रच चर्चा करून काय निर्णय घेताना दिसतात. पण असे काही घरात घडले आहे ज्यामुळे गायत्री जरा चिंतेत आहे आणि ती हीच गोष्ट आज मीराला बोलून दाखवणार आहे. मीराचं बोलणं गायत्रीला पटलं असून नक्की असं काय झालं की गायत्रीला असं वाटलं ? ते आजच्या भागामध्ये कळेलच.
गायत्री मीराला म्हणाली, मी एक ठरवलं आहे मी काही कोणाशी बोलायला जाणार नाहीये. फक्त मी बघणार आहे यावेळेस आणि मग त्याप्रमाणे मी पुढे… जर मी राहिले या शनिवारनंतर तर मग मी त्याप्रमाणे खेळेन. मीरा म्हणाली ऑफकोर्स तू रहाणार आहेस. गायत्री म्हणाली काहीही होऊ शकतं.
मी उत्कर्षला पण हेच म्हणत होते, की जेव्हा आपण गृप गृप म्हणतो तेव्हा चल माझ्यासाठी एकच माणूस खेळू शकतो तर मग ते तू खेळशील किंवा उत्कर्ष खेळेल मला कोणीही चालेल तो प्रॉब्लेम नाहीये. पण जेव्हा competitor असतात चार लोकं तेव्हा competitor ला देखील आपल्याकडुन पाठिंबा नाही मिळाला पाहिजे
ही पण आपलीच duty आहे ना ? माझा हा मुद्दा आहे. मीरा म्हणाली, म्हणून मी तुला म्हणाले काही गोष्ट या आपल्यातच राहू दे. कारण काय होणार उद्या काही झालं ना हे दोघं एकमेकांना पाठिंबा देणार हे स्पष्ट आहे एकदम जे दिसतं आहे. त्यामुळे याच्यापुढे आपण हे बोलायचे नाही.
आपल्याला माहिती आहे आपल्याला काय करायचे आहे…प्रत्येकजण इथे सेलफिश आहे, आपण बोलून घाण नाही व्हायचं हे मी इथे शिकले आहे. त्यामुळे मी बोलणं बंद केलं आहे…”
बघूया पुढे अजून काय काय गोष्टी घडल्या घरामध्ये. आजच्या भागामध्ये सदस्यांमध्ये कुठल्या मुद्द्यांवर चर्चा झाल्या.