जामखेड – जगभर कोरोनाने हाहाकार घातला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने यात्रा-जत्रा, उत्सव यावर बंदी घातली आहे. या निर्णयामुळे तमाशा कलावंतावर उपासमारीची वेळ आली असून जत्रेतील कार्यक्रमही रद्द झाले आहे. या प्रकारामुळे कलेच्या श्रेत्रातील व्यावसायिक असणाऱ्या फड मालकांना व कलावंताना याचा मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे. तमाशा कलावंत मोठ्या प्रमाणात संकटाचा सामना करावा लागत शाशनाने या कलावंतांना विशेष पॅकेज जाहीर करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब चंदन यांनी ईमेल द्वारे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली आहे.
यावेळी पाठवल्या निवेदनात म्हटले आहे कि कोरोना या विषाणुने जगभर उच्छाद मांडला आहे यामधे महाराष्ट्र राज्य ही बाधित आहे मार्च, एप्रिल व मे हे तीन महिने ग्रामीण भागातील यात्रा, उरूस असे मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम गावोगावी होत असतात. त्यामध्ये तमाशा ऑक्रेस्ट्रा असे कार्यक्रम होत असतात. मात्र यात्रा, जत्रा बंद झाल्यामुळे हे कार्यक्रमही रद्द झाले आहे. यावर कलावंतांना सध्या घरात बसुन रहाणे हा एकमेव उपाय आहे,यामुळे सर्व राज्य लाॅकडाउन आहे, सगळे उद्योग ठप्प आहेत.
यापैकीच संगीत बारी (सांस्कृतिक लोकनाट्य कलाकेंद्र) ,लावणी कार्यक्रम व तमाशा हे एक आहेत यामधे काम करणारे कमी जास्त दहा हजारापेक्षा जास्त कलाकार आहेत यामधे नर्तीका ,गायीका, तबलजी ,वस्ताद ,पेटीमास्तर व बॅकस्टेज कलाकार व कामगार असे माणस काम करत असतात तसेच यांच्या वर अवलंबुन असेलेले यांचे कुटुंब याच्या वर आज या कोरोना च्या लाॅकडाउन मुळे उपास मारीची वेळ आली आहे तरी यांना आपल्या सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या कडुन विशेष आर्थिक पॅकेज जाहिर करावे व होणारी उपासमार थांबावावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब चंदन यांनी केली आहे सदर निवेदनाच्या प्रति ईमेलव्दारे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख ,आमदार रोहित पवार याना पाठवल्या आहेत.