जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाच्या घटना कमी होऊ लागल्या आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसदेत दहशतवादाशी संबंधित घटनांची आकडेवारी मांडली.
आज राज्यसभेत जम्मू-काश्मीरशी संबंधित दोन विधेयके मंजूर करण्यात आली. जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना (दुरुस्ती) विधेयक आणि जम्मू आणि काश्मीर आरक्षण (दुरुस्ती) विधेयक अशी ही विधेयके आहे, या विधेयकांवरील चर्चेदरम्यान अमित शाह म्हणाले की, ‘कलम ३७० ने जम्मू-काश्मीरमध्ये फुटीरतावादाला चालना दिली आणि दहशतवादाला जन्म दिला. ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा विरोधी पक्षांचा मोठा पराभव आहे.
या विधेयकांवरील चर्चेदरम्यान अमित शाह यांनी जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी घटनांबाबत काही आकडेवारीही मांडली. मोदी सरकारच्या काळात जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाच्या घटना ७० टक्क्यांनी कमी झाल्याचा दावा त्यांनी केला.
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद कसा कमी झाला?
– दहशतवादाच्या घटनाबाबत अमित शाह म्हणाले की, 2004 ते 2014 दरम्यान दहशतवादाच्या 7,217 घटना घडल्या. तर गेल्या 10 वर्षांत दहशतवादाच्या 2,197 घटना घडल्या.
– दगडफेकीच्या घटनेबाबत ते म्हणाले की,’2010 मध्ये दगडफेकीच्या 2,656 घटना घडल्या. तर, यावर्षी दगडफेकीची एकही घटना घडली नाही. 2010 मध्ये दगडफेकीमुळे 112 लोकांचा मृत्यू झाला होता, तर यावर्षी एकही मृत्यू झाला नाही.’
– युद्धविराम उल्लंघन: अमित शाह यांच्या मते, 2010 मध्ये पाकिस्तानकडून 70 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते, तर या वर्षी केवळ 6 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले आहे.
टेरर फंडिंगची इकोसिस्टम संपवण्याचा प्रयत्न केला
राज्यसभेतील चर्चेदरम्यान अमित शहा यांनी आणखी आकडे मांडले. त्यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादामुळे 42 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. खोऱ्यातील दहशतवादी फंडिंगची परिसंस्था नष्ट करण्याचा सरकारने प्रयत्न केल्याचा दावा त्यांनी केला.
यापूर्वी, लोकसभेत या विधेयकांवर झालेल्या चर्चेदरम्यान शाह म्हणाले होते की, 1994 ते 2004 दरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये 40,164 दहशतवादी घटना घडल्या होत्या. 2004 ते 2014 दरम्यान 7,217 घटना घडल्या. तर मोदी सरकारच्या 2014 ते 2023 या काळात सुमारे दोन हजार घटना घडल्या आहेत.
अमित शाह म्हणाले होते की, म्हणूनच आम्ही म्हणतो की जम्मू-काश्मीरमध्ये फुटीरतावाद आणि दहशतवादाचे कारण दुसरे काही नसून कलम 370 होते.