जंव जंव बाळ बळिया वाढे । तंव तंव भोजे नाचती कोडें । आयुष्य निमालें आंतुलियेकडे । ते ग्लानीचि नाहीं ।। 511 ।। जन्मलिया दिवसदिवसें । हों लागे काळाचेंचि ऐसें । कीं वाढती करिती
उल्हासें । उभविती गुढिया ।। 512 ।। अगा मर हा बोलु न साहती । आणि मेलिया तरी रडती । परि असतें जात न गणिती । गहिंसपणें ।। 513 ।। अध्याय 9 वा
लहान मूल जसे जसे वयाने, बळाने वाढते तसे तसे त्याचे आईबाप आनंदाने नाचतात. परंतु त्या मुलाचे आयुष्य दिवसेंदिवस कमी होत आहे, याची त्यांना खंतच नसते. ते मूल जन्मापासून प्रत्येक दिवशी मृत्यूच्याच अधीन होऊ लागते.
परंतु आईबाप उल्हासाने गुढ्या उभारतात. एखाद्या मुलास “तू मर’ असे कोणी म्हटले तर त्याचे आईबाप हे अशुभ बोलणे सहन करीत नाहीत. पण तेच मूल मेले तर मात्र रडतात. परंतु उत्पन्न होणारे ते जात असते, हा विचार मुर्खपणामुळे, विषयामुळे त्यांच्या लक्षात येत नाही.