Gram Sabha support Dr. Kirsan। लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून गडचिरोलीला डॉ. नामदेव किरसान याना उमेदवारी देण्यात आलीय. याठिकाणी येत्या १९ एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. दरम्यान, आपल्या प्रचारासाठी नामदेव किरसान यांनी त्यांच्या सभा आणि भेटीगाठीचे सत्र सुरु केल. याच सत्रात जिल्हातील १४४२ ग्रामसभानी डॉ. नामदेव किरसान यांना पाठिंबा जाहीर केला आहे. हा पाठींबा जाहीर केलाय.
भाजपने आदिवासींना सन्मानाची वागणूक दिली नाही Gram Sabha support Dr. Kirsan।
ग्रामसभांनी नामदेव किरसान यांना पाठिंबा देण्यासंदर्भात एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीत विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, लोकसभा उमेदवार डॉ. किरसान यांनी ग्रामसभेच्या प्रतिनिधींचे प्रश्न समजून घेतले. यानंतर वडेट्टीवार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपाने आदिवासी बांधवाना वनवासी म्हटले आहे. भाजपाने कधीही आदिवासी बांधवाना सन्मानाची वागणूक दिली नाही. काँग्रेस पक्षाने आदिवासी बांधवाना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. राहुल गांधी यांनी दिलेल्या न्याय गॅरंटीत, काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण प्रगतीसाठीची भूमिका काँग्रेस पक्षाने मांडली असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.
गडचिरोली जिल्ह्यातील १४४२ ग्रामसभेच्या प्रतिनिधींची बैठक आज पार पडली, या बैठकीत ग्रामसभेच्या समस्या ,आदिवासी समाजाचे प्रश्न त्यांचे कायदे त्यांची अंमलबजावणी याबाबत मुद्दे मांडण्यात आले. या बैठकीनंतर बैठकीत इंडिया आघाडीचे लोकसभा उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला.
ग्रामसभांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध Gram Sabha support Dr. Kirsan।
या बैठकीवेळी डॉ. किरसान म्हणाले की, गडचिरोलीमध्ये आमचा विजय होणार. या ग्रामसभानी आम्हाला पाठिंबा दिला. त्यांनी काही अटी घातल्या आहेत. त्या कायदेशीर आहेत. त्यांचा हक्क त्यांना मिळाला पाहिजे, आम्ही ग्रामसभांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे. खासदार झाल्यावर ग्रामसभांचे प्रश्न मांडून या प्रश्नांना न्याय देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा
गडचिरोली-चिमूर मतदारसंघात आतापर्यंत 1205 मतदारांचे घरूनच मतदान