आळंदी, दि. 27 – आळंदीतील 112 दिव्यांगांच्या खात्यात नगरपरिषदेकडून प्रत्येकी 2500 रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. केंद्र शासनाकडून नगरपरिषद क्षेत्रातील नि:समर्थ (दिव्यांग) व्यक्तींना दारिद्र्य निर्मुलन योजनेंतर्गत किमान 5 टक्के निधी राखीव ठेवण्यात येतो. आळंदी नगरपरिषदेकडून सहा लाख रुपये निधी राखीव ठेवण्यात आला आहे.
यातील पहिल्या टप्प्यातील 2 लाख 80 हजार रुपये निधी नोंदणीकृत दिव्यांगांच्या खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती आळंदी नगरपरिषदेने दिली आहे. हा निधी 2022-23 वर्षासाठी असून पुढील टप्प्यात उर्वरित निधी वितरीत करण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या योजनेनुसार एकूण 6 लाख रुपये निधी दिव्यांगांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. दरम्यान, दिव्यांग नोंदणी सुरु असून गरजूंनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी केले आहे.
दिव्यांग नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे –
– दिव्यांग व्यक्ती हा आळंदी नगरपरिषद हद्दीतील रहिवासी असल्याचा पुरावा. (आधार कार्ड, मतदान कार्ड)
– 40 टक्के किंवा त्याहून अधिक अपंगत्व असल्याचे ऑनलाइन वैधता प्रमाणपत्र. (सदर प्रमाणपत्र हे ससून किंवा औध रुग्णालयातून काढलेले असावे)