उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथील लाकूड बाजारात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग इतकी भीषण होती की, आजूबाजूच्या परिसरामध्ये धुराचे लोट पसरले आहेत. या आगीच्या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर लोकांनी तत्काळ पोलिसांना तसेच अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र या आगी मागचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
फिरोजाबादमध्ये लागलेल्या या साधारण 300 दुकाने असल्याचे सांगितले जात आहे. यातील 150 दुकानं जळून खाक झाल्याचं लोकांचं म्हणणं आहे. या ठिकाणी लाकडी फर्निचर, फ्रेम्स, बोर्ड, प्लाय या वस्तुंची विक्री होते. दोन वर्षांपूर्वीही या मार्केटमध्ये आग लागली होती. फिरोजाबाद सदरचे आमदार मनीष असिजा, महानगरपालिकेच्या महापौर कामिनी राठोड, पोलीस अधीक्षक सर्वेश कुमार मिश्रा, सीओ सिटी कमलेश कुमार आणि अनेक पोलीस ठाण्यांतील फौजफाट्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे.
काठ बाजार येथील रामद्वाराजवळील दुकानांना शनिवारी रात्री साडेतीनच्या सुमारास आग लागली. हळूहळू आग संपूर्ण मार्केटमध्ये पसरली आणि शेकडो दुकाने जळून खाक झाली. दुकानाजवळील ट्रान्सफॉर्मरमधून ठिणगी पडली आणि या ठिणगीमुळे दुकानांना आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. ट्रान्सफॉर्मरमधून ठिणगी पडल्याने आजूबाजूच्या दुकानांना आग लागल्याचे समोर येत आहे. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास बाजारात झोपलेले दुकानदार व मजुरांना हा प्रकार समजताच, चेंगराचेंगरी झाली. त्यांनी त्यांच्या दुकानातील माल काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही.