ED Summons Arvind Kejriwal। दिल्ली मद्य धोरण प्रकरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अरविंद केजरीवाल यांना नवव्यांदा समन्स बजावलंय. दरम्यान, ईडीकडून आलेल्या या समन्सवर आपकडून टीका करण्यात आलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार लोकसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्र्यांना अटक करण्याचा कट रचल्याचा आरोप आपने केलाय.
दिल्लीच्या शिक्षण मंत्री आणि आप नेते आतिशी मार्लेना यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजप सरकारवर टीका केली. आतिशी म्हणाल्या की, अरविंद केजरीवाल शनिवारी ईडीच्या दोन तक्रारींबाबत राऊस एव्हेन्यू न्यायालयात सुनावणीसाठी हजर झाले. समन्स बजावूनही हजर न झाल्याबद्दल ईडीने न्यायालयात तक्रार दाखल केली होती.
तसेच पुढे बोलताना आतिशी यांनी, केजरीवाल कोर्टापासून पळ काढत असल्याचा भाजप कडून आरोप करण्यात येत होता मात्र कोर्टात हजर राहून केजरीवाल यांनी भाजप आणि त्यांच्या नेत्यांना उत्तर दिले आहे” असे त्यांनी म्हटले. न्यायालयानेही केजरीवाल यांना जामीन देऊन भाजपची मुस्कटदाबी केली आहे. ईडीने दाखल केलेल्या तक्रारींच्या सुनावणीनंतर राऊस एव्हेन्यू कोर्टाने केजरीवाल यांना जामीन मंजूर केला.
ईडीच्या समन्सवर न्यायालय निर्णय देईल ED Summons Arvind Kejriwal।
ईडीचे समन्स कायदेशीर की बेकायदेशीर याची चौकशी न्यायालय करणार आहे. समन्सवर केजरीवालांना तपास यंत्रणेकडे जावे लागेल का? भाजप कायदेशीर प्रक्रियेचा आदर करत नाही, असा आरोप त्यांनी केला. कायदेशीर प्रक्रियेतून निर्णय येण्याची ते वाट पाहत नाहीत. भाजपला न्याय आणि तपासाशी काहीही देणेघेणे नाही.
केजरीवाल यांना तुरुंगात टाकण्याचा भाजपचा कट ED Summons Arvind Kejriwal।
आतिशी यांनी आरोप केला की,” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार फक्त एकाच गोष्टीची काळजी घेते – निवडणुकीपूर्वी केजरीवाल यांना तुरुंगात टाकणे आणि त्यांना प्रचारापासून रोखणे. भाजप सरकार आणि ईडी-सीबीआयचा हा एकमेव उद्देश आहे.” ते म्हणाले की, “न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होताच ईडीने संध्याकाळी पुन्हा समन्स पाठवले. केजरीवाल यांना मिळालेल्या जामीनाने त्यांच्या अटकेचा उद्देश पूर्ण झाला नाही, असे त्यांना वाटत होते.