वॉशिंग्टन – साधारण दोन ते तीन वर्षांपूर्वी कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये जगात सर्वत्रच लॉकडाऊन जारी करण्यात आले होते 2020 च्या सुमारास लॉकडाऊनची तीव्रता सर्वात जास्त होती याच काळात सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये जंगली प्राण्यांचा मानवी वस्तीपर्यंत येण्याचा प्रवास वाढला होता असे एका संशोधनानंतर सिद्ध झाले आहे लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये रस्त्यावरील गर्दी कमी झाल्यामुळे आणि वाहतूकही मंदावल्याने अनेक प्राणी मानवीवस्ती पर्यंत येऊ लागले असे संशोधनात म्हटले आहे.
संशोधकानी दिलेल्या माहितीप्रमाणे मानवी वर्तणुकीवरच प्राण्यांची वर्तणूकही अवलंबून असते साहजिकच लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये मानवी जीवन संपूर्णपणे बंद झाल्याने रस्ते शांत होते, त्याचा परिणाम प्राण्यांच्या हालचालीवरही झाला आणि आजपर्यंत त्यांनी ज्या वस्तीपर्यंत प्रवास केला नव्हता तिथपर्यंत प्रवास करण्यास त्यांनी प्रारंभ केला होता.
जानेवारी 2020 ते मे 2020 या पाच महिन्यांच्या कालावधीमधील संशोधनाप्रमाणे या कालावधीमध्ये मानवी वस्तीपर्यंत जंगली प्राण्यांनी पोहोचण्याच्या प्रमाणात ७३ टक्के वाढ झाली होती यापूर्वी जंगली प्राणी कधीही मानवी वस्तीपर्यंत येत नव्हते एवढेच नव्हे तर मानव ज्या रस्त्यांचा वापर करत होता त्या रस्त्यांच्या आसपासही जंगली प्राणी येत नव्हते नेदरलँडमधील रेडबोर्ड संस्थेने हे संशोधन केले असून त्या मध्ये 43 प्राण्यांच्या हालचालींचा अभ्यास करण्यात आला ज्यामध्ये हत्ती जिराफ हरिण अस्वल या प्राण्यांचाही समावेश होता या कालावधीमध्ये अनेक प्राणी मानवी वसाहतीपर्यंत पोहोचल्याच्या बातम्या त्या काळात प्रसिद्ध झाल्या होत्या त्याची पुष्टी करण्यासाठी सुद्धा हे संशोधन करण्यात आले.