Devendra Fadnavis – मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून आपल्याकार्यकर्त्यांमध्येच दुही होण्याची भिती भाजपच्या नेत्यांना वाटू लागली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ही भिती अप्रत्यक्ष रित्याव्यक्त केली. प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते म्हणाले की, या आरक्षणावरूनआपल्या कार्यकर्त्यांमध्येच ओबीसी आणि मराठा असे जातीचे गट-तट होऊ देऊ नका.
मराठा समाजाला न्याय देताना ओबीसींवर अन्याय होणार नाही ही भाजपची भूमिका आहे. आपल्या आरक्षणाचे काय होणार अशी मराठा आणि ओबीसी कार्यकर्त्यांची भावना असणे यात गैरकाही नाही. पण त्यावरून विभाजनाचे लोण कार्यकर्त्यांत पसरू देऊ नका.
भाजपसाठी कुठलाही समाज मतपेढी नाही. निवडणुकीत याचा परिणाम होणार नाही. मुळात हे निवडणुकीचे मुद्देच नाहीत. तरीही राज्याच्या सामाजिक चौकटीला तडे जाता नये. मोदींना हटवण्याच्या एका अजेंड्यावर इंडिया आघाडी एकत्र आली आहे.
आपल्या घराणेशाहीला कुलूप लागेल याभीतीने ते एकत्र आले आहे. त्यांच्याकरिता कुटुंबम्हणजे देश आहे. तर मोदींकरिता देश हेच कुटुंबआहे असे फडणवीस म्हणाले. मोदींवरीलविश्वास हीच विजयाची खात्री आहे. पण म्हणून अति आत्मविश्वासात राहायला नको, असा इशाराही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.