मुंबई – बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा पुन्हा एकदा चर्चेत आला. रणदीपने नुकताच स्वतःबद्दल एक धक्कादायक खुलासा केला. त्याने सांगितले की काही काळापूर्वी तो डिप्रेशनचा शिकार झाला होता. रणदीपने बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारला डिप्रेशनसाठी कारणीभूत ठरवले आहे.
जेव्हा अक्षय कुमारमुळे रंडी हुड्डा गेला होता डिप्रेशनमध्ये
अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान त्याने याचा खुलासा केला. रणदीपने सांगितले की, 2016 मध्ये राजकुमार संतोषी यांच्या ‘बॅटल ऑफ सारागढी’ चित्रपटाची घोषणा झाली. या चित्रपटात रणदीप मुख्य भूमिकेत होता. दरम्यान, 2018 साली अक्षय कुमारच्या ‘केसरी’ चित्रपटाची घोषणा झाली आणि त्याच वर्षी हा चित्रपटही प्रदर्शित झाला. दोघांची कथा एकाच मुद्द्यावर आधारित होती. पण ‘केसरी’च्या अपयशामुळे रणदीपचा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला नाही. यामुळे तो प्रचंड डिप्रेशनमध्ये गेला होता.
अभिनेत्याने सांगितले की, ‘चित्रपट बनवण्यासाठी 3 वर्षे लागली. या प्रकल्पासाठी मी खूप मेहनत घेत होतो. चित्रपटात ईशर सिंगची भूमिका साकारण्यासाठी मी या तीन वर्षांत केस आणि दाढी वाढवली होती. या काळात मी अनेक चित्रपटांच्या ऑफर्स नाकारल्या. जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला नाही तेव्हा मी डिप्रेशनमध्ये गेलो. जणू कोणीतरी माझा फार मोठा विश्वासघात केला आहे असे वाटत होते. चित्रपट प्रदर्शित न झाल्यामुळे रणदिव हुड्डा खूप प्रभावित झाला होता. त्याने सांगितले की कोणीतरी आपली दाढी कापेल या भीतीने तो खोलीला कुलूप लावत असे. अभिनेता पुढे म्हणाला की, ‘माझ्या आई-वडिलांनी मला एकटे सोडले नाही. या गोष्टीने मी खूप प्रभावित होऊ लागलो. मग मी ठरवले की मी माझ्यासोबत असे पुन्हा कधीही होऊ देणार नाही.’ रणदीपच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, अभिनेता लवकरच ‘वीर सावरकर’मध्ये दिसणार आहे.