पुणे – बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) यांचा सध्या पुण्यामध्ये भव्य कार्यक्रम सुरु आहे. सर्वसामान्यांसोबत या कार्यक्रमासाठी राजकीय नेत्यांची देखील हजेरी लागताना दिसत आहे. धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमचा आज शेवटचा दिवस होता. दरम्यान, आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी पुणे येथे जाऊन धीरेंद्र शास्त्री यांचे दर्शन घेतले. फडणवीसांच्या या कृतीबाबत आता राजकीय वर्तुळातून देखील प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. प्रहारचे नेते बच्चू कडू (Bachhu kadu) यांनी फडणवीसांनी शास्त्रींच्या घेतलेल्या भेटीबाबत भाष्य केले आहे.
“देवेंद्र फडणीस यांना बागेश्वर महाराज महत्वाचे वाटत असतील. त्यामुळे ते पुण्याला गेले. तुकाराम महाराज वैचारिक संत होते. तर बागेश्वर महाराज चमत्कारी संत आहेत” असा टोला बच्चू कडू यांनी लगावला आहे. ते पुढे म्हणाले,”सध्या नेत्यांमध्ये, समाजात, कार्यकर्त्यांमध्ये वाद चालू आहे. हा महाराष्ट्र मला वेगळ्याच वळणावर जातोय की काय असं वाटू लागलं आहे” (Bachhu kadu dhirendra shastri)
साईबाबा आणि तुकाराम महाराज यांना बागेश्वरबाबा बोलत होते. मात्र ते आता तुकाराम महाराजांचे दर्शन घेत आहेत. त्यामुळे सर्व संपलं. प्रत्येकाच्या भावना असताना कुणी चमत्काराला मानतं कुणी नाही मानत, असं देखील बच्चू कडू म्हणाले. तसेच महाराष्ट्र सध्या वेगळ्या वळणावर जात आहे. साई बाबांच्या नगरीत त्यांचाच अपमान करणाऱ्या बागेश्वरबाबाप्रती फडणवीसांची आस्था अधिक असू शकते. त्यांचा तो व्यक्तिगत प्रश्न आहे असं देखील स्पष्ट मी मत कडू यांनी व्यक्त केलं.(Bageshwar baba video viral)
बागेश्वर बाबांकडून फडणवीसांचे कौतुक
यावेळी फडणवीस यांचं कौतुक करताना बागेश्वर बाबा म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत म्हणून मी त्यांचं कौतुक करत नसून ते एक रामभक्त आहेत.जे राम भक्त असतात ते सर्वांचे असतात तर जे रामभक्त नसतात ते कोणाचेही नसतात. त्यानंतर फडणवीस यांनीही बागेश्वर बाबाच्या सनातन धर्मासाठीच्या कामाचे कौतुक केले. बागेश्वर बाबा सनातन धर्मासाठी उत्तम काम करत असल्याचे फडणवीस म्हणाले.