मुंबई – राज्यातील उद्योगधंदे व चैनीसाठी वापरण्यात येत असलेल्या विजेवर पुढील दोन महिन्यांसाठी निर्बंध घालण्यात आले आहेत, रब्बी हंगामात शेतकऱ्यांना विजेचा वापर व्यवस्थितपणे करता यावा म्हणून महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाने हे निर्बंध घातले आहेत. 16 डिसेंबरपासून हे निर्बंध लागू होतील व त्याची मुदत 15 फेब्रुवारीपर्यंत राहील. यामुळे शेतकऱ्यांना आठवड्यातील 5 दिवस विना अडथळा व हुकमी वीज पुरवठा करता येईल.
ठवड्यातील उरलेले दोन दिवस शेती व उद्योगधंदे यांना आलटून पालटून वीज पुरवठा बंद ठेवण्यात येईल. ज्या उद्योग व्यवसायाकडे विद्युत जनित्रे आहेत त्यांनी त्यांचा पुरेपूर वापर करण्याची सक्ती करण्यात आली आहे. राज्याची विजेची गरज 1950 मेगावॅट असताना उत्पादन मात्र 1713 मेगावॅट एवढेच होत असल्याने हे निर्बंध जरूरीचे आहेत.
वाऱ्याच्या शक्तीचा वापर
वाऱ्याच्या शक्तीचा वापर अगदी इतिहासकाळापासून होत असलेला आहे. शिडाच्या बोटी हजारो वर्षे समुद्र-संचार करीत आहेत. डच लोकांनी पवनचक्क्यांचा वापर करून, पंच चालवून, समुद्र हटवून शेतजमीन समुद्राच्या घशातून ओढून काढली. परंतु वाफेची इंजिने तसेच पेट्रोल व डीझेल इंजिने आल्यानंतर मात्र अवजड व फारशा कार्यक्षम नसलेल्या पवनचक्क्यांचा जमाना संपला. आता पेट्रोल व डीझेल महाग झाल्याने जगाचे लक्ष पुन्हा एकदा पवन शक्तीकडे वळले आहे.
सोव्हियत कार्य
आधुनिक पवनचक्क्या तयार करण्याच्या क्षेत्रात सोव्हियत संघराज्यानेही बरीच कामगिरी केली आहे. मेंढ्या चारण्यासाठी दुर्गम भागात अनेकदा पाण्याची गरज लागते. तेथे विहिरी खोदल्या तरी पाणी उपसावे कसे, कारण वीजपुरवठा किंवा इंधनपुरवठा कसा करणार? त्यामुळे पवनचक्क्यांचा पर्याय पुढे आला.