पिंपरी -तब्बल 20 वर्षांच्या न्यायालयीन लढ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील कॉंग्रेसच्या जकिया जाफरी यांची याचिका निकाली काढली. न्यायालयाने पंतप्रधान मोदी यांच्या निर्दोषत्वावर शिक्कामोर्तब केले. यामुळे भारतीय जनता पार्टीची मान अभिमानाने उंचावली आहे, या शब्दांत भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन केले आहे.
आमदार लांडगे म्हणाले, देशाच्या न्यायव्यवस्थेवर भाजपचा पूर्ण विश्वास असल्यामुळेच वीस वर्षे चाललेल्या या न्यायालयीन लढाईला संयमाने सामोरे जाऊन पंतप्रधान मोदी यांनी न्यायव्यवस्थेच्या सार्वभौमत्वाविषयीचा आदर देशाच्या जनतेमध्ये रुजविला. पंतप्रधान मोदी यांच्या विरोधातील फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयानेच निकाली काढल्यामुळे भाजपचा विजय अधिक तेजस्वी झाला आहे. सन 2002 मधील गुजरात दंगलप्रकरणी नरेंद्र मोदी यांच्यासह 64 जणांना निर्दोष ठरविण्याच्या विशेष चौकशी पथकाच्या निर्णयास कॉंग्रेसच्या जकिया जाफरी यांनी दिले होते. विशेष चौकशी पथकाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयात शिक्कामोर्तब झाल्याने पंतप्रधानांविरोधातील राजकीय कारस्थानास चपराक बसली आहे, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.