मुंबई : भाजप नेते एकनाथ खडसे भाजप सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर समाधानी असल्याचे म्हंटले आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पाचे मी स्वागत करतो. सरकारने शेतकऱ्यांसाठी 16 कलमी योजना जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी प्रतिक्रिया खडसे यांनी दिली.
केंद्र सरकारने किसान रेल योजनेची घोषणा केल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन बाजारात वेळेवर पोहचवता येईल असे खडसे म्हणाले.16 कलमी योजना जाहीर करण्यात आल्यामुळे शेतकर्यांना निश्चित फायदा होईल, तसेच आयकरमध्ये दिलेल्या सुटीमुळे सर्वसामान्यांना देखील लाभ होईल अशी प्रतिक्रिया खडसे यांनी दिली आहे.