नवी दिल्ली – करोनाची बाधित संख्या वाढत असलेल्या जिल्ह्यांमध्ये रात्रीची संचारबंदी, गर्दीवर बंदी आणि लग्नातील प्रत्यक्ष उपस्थिती कमी करण्याची सूचना असणारी आचारसंहिता केंद्र सरकारने जारी केली आहे.
करोनाची संसर्गितांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने अनेक भागांमध्ये ओमायक्रॉन संसर्गित आढळत असल्याने केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांसाठी ही आचारसंहिता जारी केली आहेत. या शिफारशींमध्ये जास्त पॉझिटिव्हीटी रेट असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये करोनाला रोखण्यासंबंधीची धोरणे आणि निर्बंधांचा उल्लेख आहे.
आरोग्य मंत्रालयाने राज्यांना पाठवलेल्या पत्रात स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्याची मुभा दिली असून जिल्ह्यात गेल्या आठवड्यातील “पॉझिटिव्हिटी रेट’ 10 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास किंवा ऑक्सिजन तसेच आयसीयू बेडसाठी 40 टक्के व्याप्ती असेल तर तिथे निर्बंध लावले जाऊ शकतात असे आरोग्य मंत्रालायने सांगितले आहे.
आरोग्य मंत्रालयाने स्थानिक स्थिती तसंच लोकसंख्या लक्षात घेता आणि सोबतच ओमायक्रॉनचा वेगाने होणारा संसर्ग लक्षात घेता राज्यं आधीच प्रतिबंधात्मक उपाय आणि निर्बंध लावू शकतातओमायक्रॉन डेल्टाच्या तुलनेत तीन पाट जास्त संसर्गजन्य असल्याचं अधोरेखित केले आहे. तसंच जिल्हास्तरावर निर्णय घेताना अत्यंत तत्परता आणि लक्ष असण्याची गरज असल्याचं आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.
मार्गदर्शक तत्त्वे
आरोग्य मंत्रालयाने राज्यांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नाईट कर्फ्यू, गर्दींसाठी कठोर नियम, लग्न आणि अंत्यविधींमध्ये कमी उपस्थिती, कार्यालयं, उद्योग आणि सार्वजनिक वाहतुकींसाठी नियमावली
मार्गदर्शक तत्वे
केंद्राने यावेळी दारोदारी जाऊन रुग्णांचा शोध घेणे आणि करोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील सर्वांची माहिती घेण्यासंबंधी सुचवलं आहे. जिनोम सिक्वेन्सिंगसाठी क्लस्टर इन्फेक्शनचे नमुने ताबडतोब लॅबमध्ये पाठवले पाहिजेत, रोज योग्य प्रमाणात आरटीपीसीआर चाचणी करणं आणि करोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेणं. याशिवाय गृहविलगीकरणाची अमलबजावणी होईल याची काळजी घ्यावी. 100 टक्के लसीकरण होईल यासाठी राज्यांनी जास्त प्रयत्न करावेत. देशातील आकडेवारीच्या तुलनेत पहिला आणि दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या कमी असणाऱ्या जिल्ह्यांकडे लक्ष द्यावे. गरज भासल्यास घरोघरी जाऊन लसीकरण करा.