नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांनी इस्लाम विषयी प्रक्षोभक आणि बदनामीकारक वक्तव्य केल्यामुळे निर्माण झालेल्या स्थितीवर कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे.
या संबंधात जारी केलेल्या ट्विटर संदेशात त्यांनी म्हटले आहे की, भारत या आधीच अंतर्गत बाबतीत कमकुवत झाला आहे, आता विदेशी पातळीवरही देश कमजोर झाला आहे. भाजपच्या निर्लज्ज वक्तव्यामुळे भारत आज एकाकी पडला आहे. जागतिक पातळीवरही देश त्यामुळे कमजोर झालेला दिसत आहे, अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली आहे.
कॉंग्रेसने या प्रकरणात मोदी सरकारवर चौफेर हल्ला चढवला असून पक्षाच्या अन्य नेत्यांनी आणि प्रवक्त्यांनीही सरकारला कोंडित पकडणाऱ्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. देशातील अन्य राजकीय पक्षही या प्रकरणी सरकारवर जोरदार टीका करीत आहेत.