नवी दिल्ली :- भाजपप्रणित एनडीए आघाडीत 38 पक्ष एकत्र आल्याचा जो दावा भाजपने केला आहे त्यावर आम आदमी पक्षाने जोरदार निशाणा साधला आहे. केवळ ईडीच्या भीतीने हे सर्व 38 पक्ष एकत्र आल्याचा दावा आम आदमी पक्षाने केला आहे.
एनडीएवर टीका करताना, आपचे राज्यसभा सदस्य आणि राष्ट्रीय प्रवक्ते राघव चढ्ढा यांनी ट्विटरवर हा दावा केला आहे.
ईडीचा वापर करून तमिळनाडूतील द्रमुक पक्षांच्या नेत्यांवर छापे घालण्यात आल्याची टीकाही आप पक्षाच्या वतीने करण्यात आली होती.
केंद्रीय यंत्रणांचा वापर करून विरोधकांना धमकावले जात आहे आणि त्यांच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप आम आदमी पक्षाच्या वतीने सातत्याने केला जात आहे.