Ishan Kishan, Shreyas Iyer BCCI Issue Ultimatum | बीसीसीआयने अखेर आपले संकेत खरे ठरवताना इशान किशन व श्रेयस अय्यर यांना देशांतर्गत रणजी करंडक स्पर्धेत खेळण्याचे आदेश दिले आहेत. जर या दोघांनी हे आदेश मान्य केले नाहीत तर भारतीय संघ निवडीसाठी त्यांचा विर केला जाणार नाही, असे देखील स्पष्टपणे सांगितले आहे. दोनच दिवसांपूर्वी बीसीसीआय असा निर्णय घेइल याचे संकेत मिळाले होते.
बीसीसीआयने 16 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या रणजी करंडक ( Ranji Trophy ) क्रिकेट स्पर्धेतील पुढील फेरीपूर्वी खेळाडूंना आपापल्या राज्याच्या रणजी संघात सामील होण्यास सांगितले आहे. इशान किशन सारख्या खेळाडूने रणजी सोडून आयपीएलची तयारी सुरू केली असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर श्रेयसलाही कसोटी संघात पुनरागमन करण्यासाठी रणजीमध्ये चांगली कामगिरी करावी लागणार आहे.
वैयक्तिक कारण देत इशानने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून माघार घेतली होती. यानंतर तो अफगाणिस्तानविरुद्ध टी-20 मालिकाही खेळला नाही. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठीही त्याचा संघात समावेश करण्यात आलेला नाही. त्यातच भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Rahul Dravid ) यांनी इशानला पुनरागमन करण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळावे लागेल. असे सांगितले होते. तरीही तो अद्याप रणजी स्पर्धेतील एकही सामना खेळलेला नाही.
IND vs ENG 3rd Test : राजकोट कसोटीमध्ये ‘हा’ युवा खेळाडू करू शकतो पदार्पण, केएस भरतला मिळणार डच्चू….
प्रशिक्षकाच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून इशान ( Ishan Kishan ) बडोद्याला गेला आणि हार्दिक आणि कृणाल पडड्यासह सराव करताना दिसला होता. मात्र, कोणत्याही खेळाडूला त्याच्या आवडीनूसार कोणत्या स्पर्धेत खेळायचे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार बीसीसीआयने दिलेला नाही. खेळाडूंना विश्रांती घ्यायची असेल तरती दिली जाइल मात्र, केवळ आयपीएल स्पर्धेची तयारी करता यावी म्हणून देशांतर्गत स्पर्धेतून माघार घ्यायची हे मान्य केले जाणार नाही, असेही बीसीसीआयने ( BCCI ) जाहिर केले आहे.
Team India : इशान किशनवर ‘या’ कारणामुळे होणार कारवाई; बीसीसीआयचे स्पष्ट संकेत…
अन्य खेळाडूंनाही हाच आदेश…
रणजी खेळण्याचा बीसीसीआयचा आदेश केवळ इशान आणि श्रेयसलाच नव्हे तर कृणाल पंड्या व दीपक चहरलाही बंधनकारक आहे. जे सध्या कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघ व्यवस्थापनाच्या रचनेचा भाग नाहीत. तसेच श्रेयसच्या सुमार फॉर्ममुळे त्याला इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या तीन सामन्यांतून संघातून वगळण्यात आले होते. आता त्यालाही हा निर्णय बंधनकारक आहे. दरम्यान हार्दिक पंड्याला अद्याप राष्ट्रीय क्रिकेट अकादमीकडून (एनसीए) खेळण्यासाठी परवानगी मिळालेली नाही. त्याचबरोबर वैयक्तिक कारणांमुळे संघाबाहेर असलेल्या विराट कोहलीवर हा निर्णय लागू होणार नाही. त्याचवेळी इशान आयपीएलच्या तयारीत असून त्याने बीसीसीआयला अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.