पुणे – घरच्या मैदानावर सलग दुसऱ्या सामन्यात सुमार कामगिरी केल्यामुळे यजमान महाराष्ट्राला विदर्भकडून रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील साखळी सामन्यात 10 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. आता या सलग पराभवांमुळे महाराष्ट्राला स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी पुढील सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत.
Vidarbha Won by 10 Wicket(s) #MAHvVID #RanjiTrophy #Elite Scorecard:https://t.co/lB6egXx5JY
— BCCI Domestic (@BCCIdomestic) February 12, 2024
या लढतीत महाराष्ट्राने पहिल्या डावात 208 धावा केल्या होत्या. तर त्याला तगडे उत्तर देताना विदर्भ संघाने पहिल्या डावात 552 धावांचा डोंगर उभारला होता. दुसरा डाव सुरु केल्यावर महाराष्ट्राच्या फलंदाजांनीही चांगली लढत दिली. मात्र, या डावात प्रमुख फलंदाजांना आलेल्या अपयशामुळे त्यांचा डाव 371 धावांवर संपूष्टात आला. त्यामुळे विदर्भला निर्णायक विजयासाठी केवळ 27 धावांची गरज होती. ती त्यांनी एकही गडी न गमावता पूर्ण केली व हा सामना जिंकत स्पर्धेत आगेकूच केली.
महाराष्ट्राच्या दुसऱ्या डावात मुर्तझा ट्रंकवाला व अंकित बावणे यांनी चांगली फलंदाजी केली मात्र, पहिल्या काही सामन्यांमध्ये महाराष्ट्राने जो दबदबा राखला होता तो या सामन्यात त्यांना राखता आली नाही.
विदर्भच्या ध्रुव शौरीने नाबाद 22 तर अथर्व तायडेने नाबाद 6 धावा करत संघाचा विजय साकार केला. या सामन्यात विदर्भकडून पहिल्या डावात करुण नायरने 129 धावांची अफलातून शतकी खेळी केली. या उलट महाराष्ट्राच्या एकाही फलंदाजाला घरच्या मैदानावर मोठी खेळी करता आली नाही.