भोर – भोर-महाड रस्त्यावरील वरंधा घाटातील संरक्षक भिंतीचे काम तीन महिन्यांपासून सुरू होते. पावसाळा तोंडावर आला असून काम लवकर करण्याची मागणी होत असनाच तब्बल 10 महिन्यांनंतर 1 जूनपासून या रस्त्यावरील वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मागील वर्षीच्या पावसाळ्यात या रस्त्यावरील संरक्षक भिंत कोसळल्याने हा रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी
बंद होता.
वरंधा घाट भोरमार्गे कोकणात जाणारा एकमेव जवळचा मार्ग आहे. या घाटात संरक्षक भिंत कोसळल्याने हा मार्ग दुरुस्तीसाठी 10 फेब्रुवारी ते 30 एप्रिलदरम्यान बंद ठेवण्यात आला होता. हे काम 80 दिवसांत पूर्ण करणार असल्याचे त्यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून सांगण्यात आले होते; पण या कामाला चार महिने लागले. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 5 कोटी 40 लाख 55 हजार रुपये निधी मंजूर झाला होता. 10 फेब्रुवारीपासून भिंतीच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली.
कोकणात जाणारा महत्त्वाचा घाट
भोर एसटी आगारातून आणि पुणे स्वारगेट, तसेच इतर भागातून कोकणात जाणाऱ्या-येणाऱ्या बस आणि खासगी गाड्या या मार्गाने जातात. शिवथर घळ आणि पावसाळी पर्यटनासाठी हा घाट एक महत्त्वाचे ठिकाण असल्याने या मार्गावर सतत वर्दळ असते. सध्या लॉकडाऊन असल्याने घाटातील वाहतूक शांत असली, तर ऑनलॉकनंतर हा घाट पुन्हा गजबजणार आहे.