मुंबई – भांडुप येथील सावित्रीबाई फुले प्रसूतिगृहात २० ते २३ डिसेंबर या कालावधीत चार नवजात शिशूंच्या मृत्यू झाला. त्या दिवशी रुग्णालयातून पालकांना अचानक फोन आला आणि काहीच मिनिटात त्यांनी आपलं बाळ गमावलं.
या प्रकरणाची हा एक घोटाळा असून याबाबत अनेक बाबींंची लपवाछपवी केली जात असल्याने त्याची पोलिसांकडून चौकशी करा, अशी मागणी भाजपा आमदार आशिष शेलार यांनी केली आहे तर दुसरीकडे पालकांचा संताप,आक्रोष अनावर झाला. रुग्णालायच्या निष्काळजीपणाने आपलं बाळ गेल्याच्या वेदना पालकांनी मांडल्या. माध्यमांशी बोलतांना पालक म्हणाले,’रुग्णालायच्या निष्काळजीपणाने आपलं बाळ गेले. ते पुढे म्हणाले, आमचं बाळ तर गेलं, आता इतरांचे लेकरं तरी वाचावेत हीच प्रार्थना’ असं म्हणत पालक संतापले आहे.
दरम्यान,वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चार नवजात शिशूंचा मृत्यू जंतुसंसर्गामुळे झाला. चार बालकांपैकी एक मुलगी व तीन मुले होते. त्यापैकी दोन कमी वजनाची व प्रीमॅच्युअर होती. एक नवजात शिशू गंभीर स्वरूपात दाखल झाले. तसेच एका शिशूला फीट येऊन गुंतागुंत निर्माण झाली होती. असे त्यांनी सांगितले आहे.