bhagat singh koshyari in mumbai | महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे तसं वादग्रस्तच. महापुरुषांवरील अपमानकारक विधानं असोत अथवा राज्यपालपदावर असताना घेतलेले एकांगी निर्णय असोत, कोश्यारी नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिले. अशातच महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय देताना, त्यावेळीचे राज्यपाल कोश्यारींवर त्यांचं वागणं बेकायदेशीर होत असं म्हणत जोरदार ताशेरे ओढले. तसेच, अध्यक्षांनी शिंदे गटाच्या प्रतोदांची केलेली नेमणूकही बेकायदेशीर ठरवली. सोबतच १६ आमदारांच्या अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात ढकलला.
न्यायालयाच्या निर्णयानंतर एकंदरीतच अशी संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. अशातच आता माजी राज्यपाल कोश्यारी महाराष्ट्रात परतत आहेत.
भगतसिंग कोश्यारी जे आजपासून २१ तारखेपर्यंत मुबंई दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांचा राजभवनात मुक्काम असणार आहे. १७ मे २० मे दरम्यान त्यांचे नियोजित कार्यक्रम असल्याचं सांगितलं जात आहे. महत्वाचं म्हणजे, आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आमदारांची बैठक घेत आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर कोश्यारी राजभवनात सहा दिवस मुक्काम करणार असल्याने यामागे नेमकी काय खेळी आहे? नवीन राज्यपाल बैस यांना कोश्यारी काही धडे देण्यासाठी तर आले नाहीत ना? याबाबतच्या चंद्राचा सध्या जोरदार सुरु आहेत.