जगातील अनेक देशांमध्ये लोक अशा रितीरिवाजांचे पालन करतात, ज्याबद्दल जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. विविध देशांमध्ये मानवी अंत्यसंस्काराची परंपराही वेगळी आहे. दक्षिण अमेरिकेत एक जमात आहे जी अंत्यसंस्काराच्या वेळी विचित्र परंपरा पाळते. ही परंपरा एवढी विचित्र आहे की ती जाणून तुम्हाला विश्वासही बसणार नाही!
दक्षिण अमेरिकेत राहणाऱ्या ‘यानोमानी’ जमातीचे लोक अंत्यसंस्काराशी संबंधित ही विचित्र परंपरा पाळतात. या परंपरेत मृतांना जाळल्यानंतर उरलेली राख सूप बनवून प्यायली जाते. हे जाणून कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे पूर्णपणे सत्य आहे. या जमातीसाठी असे करणे सामान्य आहे. चला जाणून घेऊया यानोमानी जमातीचे लोक ही विचित्र परंपरा का पाळतात? या परंपरेशी संबंधित नियम काय आहेत?
यानोमानी जमात दक्षिण अमेरिकेत आढळते. जगात या जमातीला यानम किंवा सेनेमा असेही म्हणतात. दक्षिण अमेरिकेशिवाय व्हेनेझुएला आणि ब्राझीलच्या काही भागातही ही जमात आढळते. या आदिवासी जमातीची सभ्यता पाश्चिमात्य संस्कृतीपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. यानोमानी जमातीचे लोक स्वतःची संस्कृती आणि परंपरा कटाक्षाने पाळतात.
दक्षिण अमेरिकेत आढळणाऱ्या या जमातीमध्ये अंत्यसंस्कार करण्याची परंपरा फारच विलक्षण आहे. या परंपरेला ‘एंडोकॅनिबलिझम’ म्हणतात, ज्याचे पालन करण्यासाठी जमातीचे लोक कुटुंबातील मृत व्यक्तीच्या राखेचे सूप बनवून पितात.
एका मीडिया रिपोर्टनुसार, यानोमानी जमातीतील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, त्याच्या मृतदेहावर पाने आणि इतर वस्तू झाकल्या जातात. 30 ते 40 दिवस उलटल्यानंतर ते मृतदेह परत आणतात आणि उर्वरित शरीर जाळतात. यानंतर, उरलेल्या राखेपासून सूप बनवले जाते आणि प्याले जाते. ही भयंकर परंपरा जमातीतील लोक त्यांच्या परंपरांमुळे पाळतात.
* जाणून घ्या ही परंपरा का पाळली जाते ?
यानोमानी जमातीचे लोक मानतात की एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या आत्म्याचे रक्षण केले पाहिजे. या जमातीतील लोकांचा असा विश्वास आहे की एखाद्याच्या आत्म्याला शांती तेव्हाच मिळते जेव्हा त्याचे शरीर नातेवाईक खातात. म्हणूनच या जमातीचे लोक अंत्यसंस्कारानंतरची राख सुपाच्या रूपात एकप्रकारे खातात. असे केल्याने मृताच्या आत्म्यास शांती मिळते अशी त्यांची श्रद्धा आहे.
दुसर्या अहवालानुसार, जमातीतील एखाद्या व्यक्तीला शत्रू किंवा नातेवाईकाने मारले तर त्यांचे अंतिम संस्कारही वेगळ्या पद्धतीने केले जातात. अशा स्थितीत केवळ महिलाच त्याच्या राखेचे सूप पितात.