मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पावसाळी अधिवेशनात विविध मुद्द्यांवरून राज्य सरकारला घेरले होते. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यसरकारने आतापर्यंत जाहिरांतीवर केलेल्या खर्चाची आकडेवारीच रोहित पवार यांनी सांगितली आहे. राज्य सरकारने गेल्या 7 महिन्यांत 42.44 कोटी रुपयांचा खर्च जाहिरातींवर केल्याचे त्यांनी ट्वीट करत सांगितले आहे.
राज्य सरकारने पायाभूत सुविधांच्या कामांच्या आणि योजनांच्या जाहिरातीवर कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. शासन आपल्या दारी योजनेचा निव्वळ जाहिरातीचा ₹52.90 कोटी खर्च, मागच्या वर्षात राबविलेल्या योजनांची यंदा जाहिरात करण्यासाठी ₹26 कोटी खर्च आणि सत्ताधारी आमदारांच्या सुरक्षेसाठी एका वर्षाला ₹150 कोटी खर्च केल्याचे रोहित पवार यांनी सांगितले आहे. सरकारच्या पहिल्या सात महिन्यात जाहिरातीवरील खर्च ₹42.44 कोटी म्हणजेच दिवसाला ₹20 लाख खर्च असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
सरकारने केलेल्या या जाहिरातीच्या खर्चावरून रोहित पवार यांनी संताप व्यक्त केले आहे. ‘योजना राबविल्या आहेत, कामं केली आहेत, तर इतकी जाहिरात करण्याची खरंच गरज आहे का ?केलेली कामं जनतेपर्यंत पोहचण्यासाठी जाहिराती गरजेच्या आहेत का ? हा वायफळ खर्च टाळून, सर्वसामान्यांसाठी कुठली योजना राबविता आली असती का ?’ असे सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत.
सरकारच्या पहिल्या सात महिन्यात जाहिरातीवरील खर्च ₹42.44 कोटी म्हणजेच दिवसाला ₹20 लाख खर्च
शासन आपल्या दारी योजनेचा निव्वळ जाहिरातीचा ₹52.90 कोटी खर्च
मागच्या वर्षात राबविलेल्या योजनांची यंदा जाहिरात करण्यासाठी ₹26 कोटी खर्च
सत्ताधारी आमदारांच्या सुरक्षेसाठी एका वर्षाला…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 5, 2023
दरम्यान, राज्य सरकारने शासन आपल्या दारी योजने अंतर्गत शासनाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत सरकार थेट पोहोचत आहे. यावरून अनेकदा विरोधकांकडून टीकाही करण्यात आली आहे. त्यानंतर आता रोहित पवार यांनी देखील या जाहिरातीच्या खर्चाची थेट आकडेवारी समोर आणली आहे.