लॉकडाऊनच्या काळात अनेक कलाकारांनी फारसा गाजावाजा न करता आपले लग्न उरकून घेतले आहे. यामी गौतमनेही अलीकडेच लग्न उरकले आहे. आता असे समजते आहे की “बधाई हो’ची ऍक्ट्रेस अंगीरा धरनेही आता गुपचूप लग्न उरकले आहे. तिने ऍक्टर आणि डायरेक्टर आनंद तिवारीबरोबर लग्न केले असल्याचे समजते आहे.
या दोघांचे लग्न दोन महिन्यांपूर्वीच झाले आहे. पण त्यांच्या लग्नाची खबर आता बाहेर आली आहे. अंगीरा धरने आपल्या इन्स्टाग्रामच्या अकाउंटवर आपल्या लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत. आम्ही 30 एप्रिलला लग्न केले, या समारंभामध्ये फारच थोडे नातेवाईक आणि मित्रमंडळी होते.
आमच्या दोघांचे मैत्रीचे नाते आता खऱ्याखुऱ्या नात्यात बदलले गेले आहे, सगळीकडे अनलॉक व्हायला सुरुवात झाली आहे आणि आम्हीदेखील आमचा आनंद अनलॉक करायचे ठरवले आहे, असे तिने आपल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
आनंदनेही एका स्वतंत्र पोस्टमधून हीच माहिती दिली आहे. त्याच्या पोस्टला आयुष्मान खुराना, अनन्या पांडे, मिंथीला पालकर, सुमित व्यास, गौहर खान, कतरिना कैफ, नेहा धुपिया आदींनी कॉमोंट करून या दोघांनाही शुभेच्छा दिल्या आहेत. हे दोघे गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.