– जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ यांच्या सूचना
पारनेर – जिल्हाधिकारी कार्यालयावर शिव पाणंद शेतरस्ता चळवळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी शिवपाणंद शेतरस्ते खुले करण्यासह रस्त्यांसंदर्भातील विविध मागण्यसंदर्भात पेरू आंदोलन केले होते. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये जाण्यासाठी व शेतातील शेतमाल वाहतूक करण्यासाठी अतिक्रमणमुक्त रस्ते आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.
यासाठी गाव नकाशा प्रमाणे अतिक्रमित बंद झालेले गाडी रस्ते, पानंद रस्ते, पांधण रस्ते, शेत रस्ते, शिवार रस्ते, शेतावर जाण्याचे मार्ग व शिव रस्ते लोकसभातून मोकळे करून देणेबाबत सर्व तालुक्यात विशेष मोहीम राबवणे बाबत महाराजस्व अभियान अन्वये निर्देश दिले आहेत. सर्व तहसीलदार यांनी खुल्या केलेल्या रस्त्यांबाबत अहवाल सादर करणे, रस्त्यांचे मोजणी शुल्क आकारले जावू नये असे परिपत्रक जिल्हाधिकारी यांनी काढले असून जिल्हाभरातील सर्व शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
लवकरच शेतकऱ्यांचा शेतरस्त्यांचा पिढ्यान पिढ्या चालेला संघर्ष संपेल व आम्हाला न्याय मिळेल, असे महाराष्ट्र राज्य शेत व शिवपानंद रस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे, नाथाभाऊ शिंदे, ॲड.राजेंद्र नागवडे, ॲड.अजिंक्य गवळी , दादासाहेब जंगले, परेश वाबळे, किरण कुरुमकर, ॲड.गोरख कडूस पाटील, दत्तात्रय गुंजाळ, , रामदास लोणकर, संजय साबळे, योगेंद्र बंदे, दशरथ वाळूंज ,भाऊसाहेब वाळूंज, हौशिराम कुदळे, सागर सोनटक्के, बालेंद्र पोतदार, सतीश पटारे , अशोक ताके ,संतोष भाऊसाहेब शिंदे, करण सिंह घुले पाटील यांनी सांगितले.