गुवाहाटी : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना राजकीय विरोधकांना नामोहरम करण्यासाठी नवे शस्त्र गवसले आहे. ते शस्त्र म्हणजे त्रिशूळ आहे.
त्या त्रिशुळात प्राप्तिकर विभाग, सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालयाचा (ईडी) समावेश आहे, असा शाब्दिक हल्लाबोल कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना केला.
राजकीय विरोधकांना नाहक लक्ष्य करण्याला कॉंग्रेसचा विरोध आहे. तो विरोध आम्ही राज्यघटनेचा आधार घेऊन करतच राहू, असेही त्यांनी म्हटले. मोदी सरकारकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप सातत्याने विरोधकांकडून केला जातो. त्या आरोपाचीच री माजी केंद्रीय मंत्री असणाऱ्या रमेश यांनी ओढली.