श्रीनगर, : काश्मीर खोऱ्यात तीन महिन्यांच्या खंडानंतर पुन्हा रेल्वे धावताना दिसणार आहे. केंद्र सरकारने 5 ऑगस्टला जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द केला. त्या निर्णयानंतर कुठले अनुचित प्रकार घडू नयेत या उद्देशाने विविध पाऊले उचलण्यात आली.
त्याचाच भाग म्हणून रेल्वेसेवाही स्थगित ठेवण्यात आली. आता ती सेवा 11 नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याआधी तीन दिवस रेल्वे रूळांची तपासणी केली जाईल. त्यानंतर 10 नोव्हेंबरला रेल्वेसेवेची चाचणी होईल.
सुरळीत आणि सुरक्षित रेल्वेसाठी सर्वतोपरी पाऊले उचलली जात आहेत. काश्मीर खोऱ्यात बारामुल्ला ते बनिहाल दरम्यान रेल्वे धावते. त्यामुळे उत्तर आणि दक्षिण काश्मीर जोडले जातात.