बॉलिवूडमध्ये स्टार किडची एक नवी पिढी लॉंच होते आहे. सारा अली खान, जान्हवी कपूर, ईशान खट्टर, अनन्या पांडे सारखे कलाकार नवीन सिनेमांमधून दिसत आहेत. तर दुसरीकडे करण जोहर नव्या दमाच्या कलाकारांवर खार खाऊन त्यांचे खच्चीकरण करायला लागला आहे. करणला त्याचा राग अनावर झाला आणि त्याने शाहिद कपूरच भाऊ ईशान खट्टरला “धर्मा’ प्रॉडक्शनच्या कामातूनच बाद केले आहे. ईशानच्या बरोबर आता यापुढे कामच करायचे नाही, असे करण जोहरने ठरवून टाकले आहे. ईशानला घेऊनच करण जोहरने “धडक’ बनवला होता. मात्र आता त्या दोघांमधील मैत्रीचे संबंध पूर्वीसारखे राहिलेले नाहीत.
ईशान खूप मनमानी करतो. तो उद्धट आहे, या कारणास्तव करणने हे पाऊल उचलले आहे. अलिकडेच करण आणि ईशानमध्ये खूप वादावादी झाली होती. त्या दरम्यान ईशानचे बोलणे करणला आवडले नाही. त्याने ईशानला बाहेरचा रस्ता दाखवला. एवढेच नव्हे तर “धर्मा’ प्रॉडक्शनसाठी काम करणाऱ्या सर्व दिग्दर्शकांनाही ईशानपासून दूरच राहण्याची सूचना करण्यात आली असल्याचे समजते आहे. या दोघांपैकी कोणीही याबाबत काहीही वक्तव्य केलेले नाही.