BJP Manifesto – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ईशान्येच्या विकासासाठी सतत काम करत आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यात कनेक्टिव्हिटी असावी, ही त्यांची दृष्टी आहे. गेल्या १० वर्षांत सिक्कीममध्ये झालेले बदल तुम्ही स्वतः पाहू शकता. त्यामुळेच सिक्कीमच्या भविष्यातील उत्कर्षासाठी भाजपाच कटीबद्ध आहे, असे सांगत पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सिक्कीमची राजधानी गंगटोक येथे पक्षाचा विधानसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. सिक्कीम विधानसभेच्या ३२ आणि लोकसभेच्या एका जागेसाठी १९ एप्रिलला मतदान होणार आहे. (BJP manifesto is attracting voters)
नड्डा पुढे म्हणाले, मोदींनी गेल्या १० वर्षांत ईशान्येत ५ लाख कोटी रुपये खर्च केले, हे जाणून तुम्हाला आनंद होईल. पूर्वीच्या सरकारने ईशान्येकडील राज्यांना स्वत:चा बचाव करण्यासाठी सोडले होते. काँग्रेसची ही पद्धत आहे. पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी ‘लूक ईस्ट, ऍक्ट ईस्ट’ आणि ‘ऍक्ट फास्ट, ऍक्ट फर्स्ट’ हे धोरण आखले होते.
पंतप्रधानांनी केवळ सिक्कीममध्ये सुमारे ५५ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली आहे. तसेच भाजपा कलम ३७१ एफ चे रक्षण करणार आहे. सिक्कीममध्ये राहणारा कोणताही नागरिक भारतीय नागरिक म्हणून ३७० एफ द्वारे परिभाषित केला जातो.
या अंतर्गत १९६१ च्या रजिस्टरमध्ये नोंदणी केलेल्या लोकांनाही सिक्कीमच्या मूळ रहिवाशांच्या बरोबरीने लाभ देण्यात आले आहेत. भाजपने सिक्कीममधील महिला आणि तरुणांना पुढील पाच वर्षांत २५ हजार नोकऱ्या देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. अम्मा कॅन्टीन चालवल्या जातील, जिथे लोकांना स्वस्त जेवण मिळेल.
जाहीरनाम्यात मोठ्या घोषणा
१. कलम ३७१ एफ चा आत्मा आणि घटकांचे रक्षण करू.
२. केंद्र सरकारच्या सहकार्याने राज्यात इंडियन इन्स्टीट्युट ऑफ मॅनेजमेंट उभारणार
३. सिक्कीममध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन उभारणार
४. राज्यातील तरुणांना सक्षम करणार
५. पर्यटनाला चालना देण्यासाठी हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट उभारणार
६. पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ९००० रुपयांची वार्षिक मदत देणार
७. कृषी आधारित पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी ५०० कोटीचा निधी देणार आ
८. रिजनल इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल सायन्सेस स्थापन करणार
९. राज्यात १५ हजार लखपती दीदी तयार करण्याचे उद्दिष्ट
१०. सिक्कीम गती शक्ती मास्टर प्लॅन अंतर्गत रस्ते, रेल्वे व हवाई कनेक्टिव्हिटी सुधारणार