नगर, (प्रतिनिधी) – जिल्ह्यात यंदा अत्यल्प पाऊस झाल्यामुळॆ दुष्काळाजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा फटका मानवी जीवनासह वन्य प्राणांना देखील बसत आहे. चारा व पाणी टंचाईचा प्र्शन आतापासूनच भेडसावू लागला आहे. अशीच परिस्थीती नगर तालुक्यातील आदर्श गाव मांजरसुंबा येथे झाली आहे.
जंगलातील वन्यजीव अन्न पाण्याच्या शोधात वणवण भटकत आहे. जंगलात पाण्याची व्यवस्था होत नसल्यामुळे या प्राण्यांनी नागरी वस्तीकडे धाव घेण्यास सुरुवात केली आहे. या वन्यप्राण्यांना जगावण्यासाठी सन्मान फाऊंडेशनतर्फे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
मांजरसुंबा येथील डोंगर भाग असल्याने या याभागात रान डुक्कर, ससे, हरिण, बिबट, माकड यासह विविध पक्षी असे अनेक जातीचे पशु-पक्षी वास्तव्यास आहे. या प्राण्यांसाठी सुरक्षित असल्यामुळे या ठिकाणी वन्यप्राणी मुक्तपणे संचार करताना दिसतात. यावर्षी पाऊस अत्यल्प प्रमाण पडल्यामुळे पुरेसा पाणीसाठा जमा झाला नाही.
त्यामुळे दिवसेंदिवस तलाव कोरडे पडत आहे. याच अनुषंगाने सन्मान फाऊंडेशनतर्फे पाणवठ्यात पाणी टाकण्याचे काम केले आहे. या उपक्रमात सन्मान फाऊंडेशनचे अध्यक्ष रशीद शेख, उपाध्यक्ष अमोल वाघमारे, सचिव प्रदीप कदम, सागर वाघमारे, बालम शेख, सीताराम वाघमारे, शान शेख, दिनेश वाघमारे, ओमकार वाघमारे, शशिकांत वाघमारे, ओमकार वरखेडे, तसेच मांजरसुंभा गडावर फिरण्यासाठी येणाऱ्या मान्यवराही या उपक्रमात सहभाग नोंदविला.
वन्यजीव विभागाकडून तातडीने उपाययोजना हवी
कमी पर्जन्य झाल्यामुळे नगरतालुक्यासह जिल्ह्यात सर्वत्र भूजलपातळी खालावली आहे. परिणामी मांजरसुंभा जंगलात वास्तव्य करणारे वन्यप्राणी मानवी वस्त्यांकडे धाव घेत आहेत. ही भटकंती रोखण्यासाठी वन्य प्राण्यांसाठी वन विभाग व वन्य जीव विभागाने ठोस उपाय योजना कराव्यात. जेणेकरून वन्य प्राण्यांचा बळी जाणार नाही.- रशीद शेख, अध्यक्ष सन्मान फाऊंडेशन, मांजरसुंबा