Shinde Group vs Thackeray Group। लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या महाभारत घडताना दिसून येत आहे. भाजपच्या दबावामुळे शिंदेच्या उमेदवारांचे तिकीट कापले जात असल्याचे म्हटले जात आहे. त्यात लोकसभेसाठी उमेदवारी नाकारल्यामुळे यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार भावना गवळी नाराज आहेत. त्यांच्या जागी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर सभेत बोलताना एकनाथ शिंदे यांनी नाराज असलेल्या भावना गवळी यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.
आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही Shinde Group vs Thackeray Group।
यावेळी सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, राजकारणात आपल्याला काही निर्णय घ्यावे लागतात. कोणालाही वाऱ्यावर सोडले जाणार नाही. भावना गवळी यांनाही आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. आपण महायुतीचा अनादर करणार नाही, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्यावर अजून भावना गवळी यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
‘गद्दारांना 10 घंटे थांबूनही उमेदवारी नाही’ Shinde Group vs Thackeray Group।
दरम्यान, याच मुद्दावर ठाकरे गटाकडून शिंदे गटावर निशाणा साधण्यात आला. याविषयी बोलताना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी “आम्ही त्यांना (भावना गवळी) तब्बल 5 वेळा खासदार केले. पण आता 10 तास थांबूनही त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे गद्दारांनी याचा विचार करावा, असे ते म्हणाले आहेत.
आज तेच शिंदे आपल्या खासदारांना तिकीट मिळवून देऊ शकत नाहीत. हे हाल सध्या मिंधे गटाचे झाले आहेत. आता विधानसभा निवडणुकीत काय होईल याचा विचार 40 गद्दारांनी करावा. कारण, आता एकेकाची विकेट पडण्यास सुरुवात झाली आहे, असेही ठाकरे इशारा देत म्हणाले.
“शिंदेंचा पक्ष काही महिन्यांचाच सोबती”
दुसरीकडे ठाकरे गटाचे विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी, शिंदेची शिवसेना हि काही महिन्यांपुरतीच सोबती असल्याचा मोठा दावा केलाय. शिंदे गट हा सध्या भाजपच्या ताटाखालचे मांजर झाल्याचीही टीका त्यांनी यावेळी केली. तसेच भाजपची सध्याची खेळी दुर्दैवी आहे. महायुतीवर यवतमाळ व हिंगोलीतील उमेदवार बदलण्याची वेळ आली आहे. त्यामुळे ही महायुती आहे की महाबेकी हेच समजत नाही. याऊलट आमच्याकडे सगळी एकी आहे.