Ramdas Athawale । केंद्रीय मंत्री आणि रिपाईचे सर्वेसर्वा रामदास आठवले यांच्या गाडीचा (दि. २१) गुरुवारी साताऱ्यात अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. रामदास आठवले यांच्या वाहनाला कंटेनरने धडक दिली. या अपघातात रामदास आठवले यांच्या गाडीचं मोठं नुकसान झालं आहे. ( Ramdas Athawale | Car Accident )
परंतु, सुदैवाने रामदास आठवले या अपघातातून सुखरुप बचावले असून, अपघातानंतर ते दुसऱ्या गाडीने मुंबईच्या दिशेने रवाना झाले असल्याचं सांगण्यात येत आहे. ही अपघात साताऱ्यातील वाई परिसरात हा घडला आहे.
यावेळी रामदास आठवले हे आपल्या कारने साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने येत होते. यावेळी वाई परिसरात त्यांची कार एका कंटेनरला जाऊन धडकली. या धडकेत कारच्या बोनेटचा भाग पूर्णपणे चेपला गेला आहे.
मात्र, या अपघातामध्ये रामदास आठवले यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. दरम्यान, रामदास आठवले मुंबईत आल्यानंतर कदाचित माध्यांशी संवाद साधतील तेव्हा अपघाताबद्दल सविस्तर माहिती देऊ शकतील.