नेवासा – नेवासा तालुक्यातील भानस हिवरे रोडलगत विषमुक्त सेंद्रिय खतांचा वापर करुन ऊसापासून रसवंतीगृह विश्वनाथ चव्हाण यांनी सुरू केले आहे.
या नैसर्गिक ऊस रसवंतीगृहाचे उद्घाटन कृषी शास्त्रज्ञ डॉ.अशोकराव ढगे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भानसहिवरेचे सरपंच किशोर जोजार हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून जाणता राजा पतसंस्थेचे चेअरमन लक्ष्मणराव मोहिटे व उपसरपंच दत्तात्रय काळे, सदस्य शाहू माकासरे प्रगतशील शेतकरी भाऊसाहेब काळे सौ.वत्सलाबाई चव्हाण रंभाजी मकासरे,रावजी मकासरे, आरेब भाई शेख व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
या उस रसवंती गृहाचे वैशिष्ट्य विषद करतांना डॉ. ढगे म्हणाले की, या रसवंती गृहात ज्ञानेश्वर १६ ही उसाची जात वापरण्यात येणार आहे या उसाला कुठल्याही प्रकारचे रासायनिक खतांचा वापर केलेला नाही तसेच कीटकनाशक व रोगनाशक यांची फवारणी नाही या उसाच्या रसाची प्रयोगशाळेत तपासणी करून असे आढळले आहे की, याची प्रत किमान दोन तास खालावत नाही.
आजच्या नवीन युगात ग्राहकांना नैसर्गिक व सेंद्रिय तसेच विषमुक्त उसाचा ताजा रस देणे ही संकल्पना विश्वनाथ चव्हाण यांची असून त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन नेवासा पंचायत समितीचे माजी सभापती किशोर जोजार यांनी केले आहे ही संकल्पना व उपक्रम कृषी शास्त्रज्ञ डॉ.अशोकराव ढगे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे तालुक्यासाठी उपलब्ध झाल्यामुळे सर्वञ कौतुक करण्यात येत आहे